Skip to main content

Posts

Showing posts from January 4, 2025

*शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे**१३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन**साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर**कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा*

*आहुर्ली प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन* --------    साहित्य हे वास्तवाशी निगडीत असावे.सामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवुन त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदाराच्यां हातचे बाहुल नको, तर प्रस्थापितानां देशोधडीला लावणार्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य.शेती मातीचा लढा साहित्यातुन प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने मोडाळे ता.ईगतपुरी येथे आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.    व्यासपिठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, जेष्ठ साहित्यिक तथा परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष देविदास खडताळे, परियदेचे संघटक अमोल कुंभार, उद्योगपती तानाजी गायकवाड, अभिनेते तथा साहित्यिक अजय बिरारी,लेखक प्रशांत कोतकर जळगाव, दिलीप कजगावकर, माणिकराव गोडसे, पुंजाजी मालुंजकर, न्या.सलंत पाटिल, परिषदेचे उत्तर म...

शेगाव मध्ये गजानन महाराज मंदिर भोवती फेरी वाल्यांचा विळखा.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरा भोवती फेरी वाल्यांचा विळखा असल्याने गजानन भक्तांना या ठिकाणी खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.विशेष करुन मंदिराच्या मुख्य दरवाजा जवळ आणि संपूर्ण रस्त्यावर फेरीवाल्यांचे साम्राज्य असल्याने भाविकांची खूप च गैरसोय होते.रस्त्यावर आणि मुख्य दरवाजा जवळ टाळ विकणारे,हार,गजरे, कपाळावर गंध लावणारे, मुख्य दरवाजा अडवून आपल्या वस्तू ची मोठ्या ओरडून, भाविकांच्या अगदी जवळ येऊन वस्तू तोंडापर्यंत नेऊन विक्री करताना दिसतात.मुख्य दरवाजा जवळ कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक ही कोणतीही फेरीवाल्यांवर करीत नाहीत.मंदिरापासूनचा बाहेरुन रस्ता तर फेरिवाले राजरोसपणे मोठं मोठ्याने ओरडून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.पोलीस वाहन व वाहतूक नियंत्रण पोलिस ही फक्त मेन रस्त्यावर कर्तव्य करताना दिसतात.रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध ही फेरीवाले आपली दुकाने थाटून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.प्रासादिक वस्तू, फोटो ची दुकाने, चहा नाश्ता ची दुकाने,खेळणीची दुकाने, हळदी कुंकू,अशा फेरीवाले मुळे खरोखरच भाविकांची चालताना कोंडी होते, वृध्...

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहावे.. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पुणे येथील वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा करीता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षी ही पुणे वाफगाव यैथे होणाऱ्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा.शूर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार आहोत.वयाच्या अवघ्या २४ वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८०५ मध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतः राज्याभिषेक करून ते होळकर घराण्याचे महाराजा झाले.छत्रपती शिवाजी महाराज नंतर राज्याभिषेक करून महाराजा बनलेला यशवंतराव होळकर हा एकमेव राजा होय.इंग्रजांना लढाईत १८ वेळा पराभूत करून सळो की पळो करून सोडले होते.तमाम धनगर समाज बांधवांनी आपसातील मतभेद विसरून,पक्ष संघटना संस्था, प्रतिनिधी या एकत्र येऊन पुणे वाफगाव यैथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे.असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक ग...