Skip to main content

Posts

Showing posts from December 19, 2024

मान्यवर आदरणीय प्रा.नागेश सर

  वाचिता दैनिक विदर्भ सत्यजीत  आनंदाश्रु नयनी आले  कष्टाविना फळ नाही  हे आपण सिद्ध केले  पाहता रुप आपुले दिसे चेहऱ्यावर हास्य  कलागुणांनी संपन्न  असे कर्तृत्वाचे यश शिक्षकी बाणा आपुला  अध्ययन अध्यापनात प्राण ज्ञानार्जनासाठी तळमळ साहित्याची घेतली आण नाईट हायस्कूल अध्यापन दिवसा असे समाजकार्य शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक  क्षेत्र चौफेर  करी‌ सत्कार्य  आठवतो तो दिवस कवितेत केले मार्गदर्शन नाही विसरणार कधी आहात आपण मार्गदर्शक वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक  वाचनीय ,अर्थपूर्ण साहित्य ज्ञानात पडे भर वाचनाने मन उत्साहित वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक  लिखाण करते आनंदाने विचारांना मिळे चालना कविता,लेख लिहिण्याने पुरस्काराने सन्मानित  आपण नेहमीच व्हाल हीच सदिच्छा सारस्वतांची  यशोशिखर गाठाल सौ. रजिता रविन्द्र चव्हाण  बोरिवली मुंबई.

*मनातील खदखद...*

        आपण माणूस म्हणून या भूतलावर जन्मा आलो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.हा जन्म पुन्हा नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.मृत्यू आपल्या हातात नाही,तो कधी,कसा येईल काही सांगू शकत नाही.त्याला काही कारण लागत नाही...झोपेत ही जावू शकतो? किंवा भयाण अपघात मधून सुखरूप वाचूही शकतो.म्हणून लाभलेल्या जन्मांचे सार्थक करावे असे मला तरी वाटते."*केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे.*"           प्रत्येक चांगल्या,अवघड गोष्टीची सुरुवात त्रासदायक असते.रूढी,परंपरा या हळू हळू बदलल्या पाहिजे,किंबुहना तो निसर्ग नियम आहे.आपली एवढी मोठी लिखित राज्यघटना वेळ प्रसंगी बदलता येतात..त्यातील कलमे काढणे किंवा नवीन कलमे त्यात मिळविणे.मग,या रूढी, परंपरा का बदलता येत नाही.स्वार्थ साधण्यासाठी बऱ्याच गोष्टी परंपरा नावाखाली केल्या जातात.विज्ञान फक्त शिकतो किंवा शिकवितो... पण,प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.जन्म,मृत्यू सजीवांची लक्षणे आहेत,ते कोणाच्या ही हातात नाही.मग,प्रत्येक जण मृत्यू पावणार आहे.हे अंतिम सत्य तर सर्वांनाच मान्य असावे....