Skip to main content

Posts

Showing posts from November 21, 2024

*"कवितेच्या पारावर" प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा दुसरा शुभारंभी प्रयोग संपन्न*

ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते.         हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती.‌ या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती.           कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या ...

अभिप्राय. दिवाळी अंक - प्रवरेचे पाणी

आजही पूर्वीचे दिवाळीचे दिवस आठवतात...दिवाळीची स्वच्छता,फराळ बनविणे,कपडे,रांगोळी,दिवे,आकाश कंदील,माळा,फटाके खरेदी,घर रंगवणे,सजवणे इत्यादी कामे चालू असताना दिवाळी अंक वाचनाची खूप ओढ लागलेली असायची.वडील कधी दिवाळी अंक खरेदी करून आणतील आणि तो आपल्याला वाचायला मिळेल तो उत्साहच अदभुत होता.तोच उत्साह अजून ही आपल्या चेहऱ्यावर दिसतो,वागण्यातून जाणवतो,तीच धडपड,तोच अट्टाहास,अन् त्याच्या सोबत आता आपलेही लेखन सर्वांनी वाचावे यासाठीची उर्मी,त्यासाठी आपल्या मनातील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्याचे सर्वांनी कौतुक करणे,आपल्या कौतुकाने आई वडिलांच्या ,नातलगांच्या - मित्र मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद, आपल्याला प्रेरणा देतो,हेच दिवाळी अंकाचे प्रचंड यश.           "प्रवरेचे पाणी" दिवाळी अंक हाती पडला अन् त्यावरील मुखपृष्ठ पाहून मन हेलावून गेले.किती सुंदर,अचूक मुखपृष्ठ आहे...ज्यांनी आपले संपूर्ण जीवन नेहमी इतरांना मदत करण्यात घालविले,आपल्या भारताचे अनमोल रत्न रतनजी टाटा.सरस्वती सोबत लक्ष्मीची कायम कृपा दृष्टी त्यांच्यावर होती.पण,नित्य विनम्र भाव त्यांच्या सात्विक चे...