Skip to main content

Posts

Showing posts from March 3, 2025

महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन व पोलीस यांचा वचक राहिला नाही... पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली

सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.संतोष देशमुख निघृण हत्या, कैलास बोराडे यांच्या शरीरावर दिलेल लोखंडी रॉड चे चटके, स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अन्याय, वगैरे वगैरे घटनांनी लोक हादरलेले आहेत,अशा घटना म्हणजे राज्याला एक प्रकारे लागलेला कलंक आहे,या घटनेतील काही आरोपी पोलिसांना अजून सापडलेले नाहीत,ही अत्यंत खेदाची बाब आहे, अन्याय झालेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे ,यांचा विचार न करता ती एक व्यक्ती आहे,यांची जाणीव ठेवावी.माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संवेदनशील मनाचा थरकाप उडविते, ज्या समाजातील व्यक्ती वर अशा प्रकारे अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने त्याचा समाज उभा राहून न्याय मागत असेल तर बिघडले कुठे? पोलीस व शासन यांनी यांना आवर नाही घातला तर ते आणखी निर्भिड,बेडर होऊन दुसरे गुन्हे करतील.अशा गुन्हेगारांना वेळी च अटक करुन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,

काव्य दरबार उरण.. पोपटी कवी संमेलन

   नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार      काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक-  श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.      सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली.        व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्...