Skip to main content

Posts

Showing posts from May 16, 2025

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्थापित प्रभू श्रीराम मंदिर येथे फुटलेल्या पत्रातून पाण्याची गळती.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाली असल्याचे दिसून येते.पंढरपूर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी येथील मंदिराच्या व्हरांड्यात पाणीच पाणी जमा झाले होते.आमचे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके यांनी यावेळी मंदिरात दर्शनासाठी गेले असता व्हरांड्यात पाणीच पाणी आढळून आले.येथील पत्र्यांना ठिक ठिकाणी छिद्रे पाडली आहे, त्या मधून मंदिराच्या व्हरांड्यात पाणी पडत असते, येणाऱ्या आषाढी वारी पूर्वी व पावसाळा सुरू होण्यापूर्वी छिद्राची दुरुस्ती करावी.