Skip to main content

Posts

Showing posts from December 12, 2024

तिफण कविता महोत्सवाच्या निमित्ताने

  कन्नड तालुक्याला समृद्ध असा नैसर्गिक , ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गावात नाटय कलावंत असून त्यांनी ही नाटयपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे. जागर गोंधळ, कीर्तन, भारूड आदी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम करणारे मान्यवर येथे आहे. आदिवासी ठाकर, भिल्ल आणि बंजारा हे समुदाय आजही  आपले सांस्कृतिकपण जपतांना दिसतात. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि गावोगावी होणाऱ्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तालुक्याचे भूमिपुत्र मा. मानसिंह पवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने कन्नड तालुका महोत्सव, लोकतेने बाळासाहेब पवार सांस्कृतिक उत्सव आणि आता सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव, फिल्म फेस्टिवल, व्याख्यानमाला तसेच इतर कार्यक्रम सातत्याने होत आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा जिजाऊ महोत्सव, पिशोरच्या समता विद्यालयाचा समता महोत्सव हे तालुक्याच्या नावलौकिकात महत्वाचे योगदान देत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यिक कार्यक्रम घेव...

गरजू वधू वरांच्या पालकांनी बोगस विवाह संस्थे पासून सावध रहावे... पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी बोगस विवाह संस्थेचे जाळे पसरले असल्याने गरजू वधूवरांच्या पालकांनी त्या पासून सावध रहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.या बोगस विवाह संस्था प्रथम गरजू वधू वरांच्या पालकांशी संपर्क साधतात, त्यांच्या अपेक्षा विचारुन घेतात,त्याच प्रमाणे मन मानेल तशी फी आकारली जाऊन बोगस विवाह संस्थेत नाव नोंदणी केली जाते.अपेक्षित स्थळांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर, पत्ता, घेऊन ते गोपनीय ठेवले जाते.व समोर पालकांना सांगतात " तुम्हाला हवे तसे स्थळ आलेले आहे.आम्ही बैठक घडवून आणतो, त्या आधी तुम्ही बैठकीची अमुक अमुक रक्कम जमा करावी.गरजू पालक पैसे जमा करतात, पुन्हा विवाह संस्था बैठकीच्या आयोजनाचे  वेळी वेगवेगळी कारणे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करतात.यात पालक फसतात.मोबाईल वरुन विवाह संस्थेशी संपर्क केला असता "आपण नंतर संपर्क करा"  म्हणून कळविले जाते, किंवा फोन उचलला जात नाही,अशा बोगस विवाह संस्थेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.पुणे, मुंबई, मुंबई उपनगरे,लातुर, सोलापूर, सातारा,या ठिकाणी व पश्चिम महाराष्ट्र मधील काही ठिकाणी अशा बोगस वि...