Skip to main content

Posts

Showing posts from March 25, 2025

रणजित पवार लिखित ममता पहिलवान या पुस्तकासराज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ओतूर - राष्ट्र सेवा परिषद आणि मराठबोली संस्था ,पुणे यांच्या वतीने, दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केल्या जाते. यावेळेस श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतूर येथील कवी,लेखक रणजित पवार लिखित व लेण्यांद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले, देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या पुस्तकास ' राज्यस्तरीय प्रभुरत्नाई साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.      १०० वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावची महिला ममता पहिलवान यांनी कुस्तीक्षेत्रात फार मोठे नाव कमावले होते. त्याकाळात पुरुषासंगे संपूर्ण कपडे काढून फक्त लंगोट घालून आखाड्यात उतरत असे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या कुस्त्या खेळल्या तेवढया संपूर्ण जिंकल्या.त्यांची परिसरामध्ये 'ममत्या पहिलवान ' म्हणून आजही ओळख आहे. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या तरुणांसाठी,खास करून मुली व महिलावर्गासाठी एक आदर्श आहे.प्रेरणा देणारे आहे.कारण ज्या काळात महिलांवर अनेक बंधने होती.त्याकाळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीखेळामध्ये ममता पहिलवान पुरुष बनून नि...

रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा... संभाजी राजे छत्रपती यांची मागणी तर महाराष्ट्रातील धनगर समाज यास तीव्र विरोध करेल.. बाळासाहेब दौडतले.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या या मागणीला महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र विरोध करेल असे बीड मधील धनगर समाजाचे बाळासाहेब दौडतले यांनी जाहीर केले, यावरून महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ में २०२५ पूर्वी हटविण्यात यावी, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठे ही संदर्भ, उल्लेख आढळत नसल्याने आणि भारतीय पुरातत्व विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक काळ संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते,१०० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी केलेली असून त्यावर मात्र बीड मधील धनगर समाज बांधव तीव्र आक्रमक झालेला असल्याने महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत, धनगर समाजाला व...

*महिला दिन विशेष माझा प्रवास उलगडताना कार्यक्रम संपन्न*

(नवी मुंबई): आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी  साहित्य परिषद, योग विद्या निकेतन वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिला दिन विशेष कार्यक्रम 'माझा प्रवास उलगडताना' संपन्न झाला. नवी मुंबईतील कर्तबगार महिलांशीशी संवाद त्यांचा जीवन प्रवास असा या कार्यक्रमाचा विषय होता. प्रातिनिधिक स्वरूपात काही खास महिलांचा तेथे सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार मा.दुर्गेश सोनार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा.नंदकिशोर जोशी, कार्यवाहक डॉ.अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षमा वाखारकर यांनी केली तर सूत्रसंचालन सौ.ऋतुजा गवस यांनी केले. या कार्यक्रमाला राधा गानू, शुभांगी पाटील, मीरा जोशी, स्मिता वाजेकर, श्रध्दा  साळस्कर, अक्षता गोसावी ऋतुजा  गवस, कल्पना देशमुख, भारती  वार्डेकर यांचा साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवी मुंब...