सुनील शिरपुरे/यवतमाळ सोमवार दि.२७ जानेवारी २०२५ रोजी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, मानस सेवा केंद्र, मायको हॉल सिडको नवे नाशिक येथे मोठ्या उत्साहात पुरस्कार सोहळा व कवी संमेलन पार पडले. या सोहळ्याचे आयोजन साहित्यरंग साहित्य मंच नाशिकच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा.रविकांत शार्दुल, स्वागताध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ कवी मा.सुभाष उमरकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका मा.सौ.इंदिरा जाधव जळगाव तर प्रमुख पाहुणे मा.हर्षवर्धन संजय सोनवणे, मा.सुहास टिपरे, युवा उपस्थिती मा.अश्विनी सांगळे, युवा कवी वक्ते व्याख्याते सुशीलकुमार देवराव शिंदे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २१ व्यक्तींना समाज सेवा सन्मान, साहित्यरत्न, नारी रत्न असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी कविवर्य अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार - २०२५ हा ...