महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला. हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गी...