Skip to main content

Posts

Showing posts from August 13, 2024

* डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय सातारा यांचा कै. भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर

कवि सरकार इंगळी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा तर्फे तर्फे दिले जाणारे कैलासवासी भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कादंबरी कथा कविता बालसाहित्य यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्य कृती यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार रु २५०० रु व स्मृतीचिन्ह १) कडेलूट - कादंबरी       ले .डॉ श्रीकांत पाटील २ )  'काळ ' मेकर लाइव्ह - कादंबरी        ले - बाळासाहेब लबडे राज्यस्तरीय अक्षर गौरव  विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप रु १००० व स्मृतीचिन्ह १) वसप - कथासंग्रह          ले - महादेव माने २ ) प्रकाश पेरणी - कवितासंग्रह         कवी - सुभाष कवडे ३ ) वसुंधरेचे शोधयात्री - संकीर्ण          ले - डॉ अनुराग  लव्हेकर ४)  कुणब्याची पोरं - कथासंग्रह           ले - आप्पासाहेब खोत ५ ) भैरवायन - कादंबरी            ल...

*एक सुविचार***************

*मूलतः देवदत्त निसर्गच मुक्त बेबंध आहे .नयनरम्य सुंदर प्रसन्न असा त्याचा सदैव समतोल सांधणारा आविष्कार आहे. हे सत्य आपण पाहतो आहोत.* *मी तर म्हणतो मग सात्विक , नैतिक विचारांना कशाला हवीत बंधने..?* *सर्वांनीच आपली नैतिक विचारधारा प्रामाणिकपणे विवेकाने जपत जगत रहावं त्यात खरे आत्मसुख आहे असं मला वाटतं..!* *अगदी मुक्तमोकळं कुणालाही न दुखवता जीवनात व्यक्त होत जगत रहावं..!* *हा निर्मोही संस्कार आहे तिथेच तर देवत्व , संतत्व प्रत्ययास येत असते.*  *आपल्या मनांतरात सर्वच प्राणिमात्रांच्या बाबतीत निर्मळ प्रीत, मैत्रभावनां जागृत ठेवून अगदी सहज प्रत्येकाच्या मनात राहण्याचा शाश्वत विचार करावा हेच सत्कर्म आहे.  हेच खरे संचित  आहे.* *आपलं जीवन जगताना , आपले सुखावणारे छंद जोपासताना आपण आपल्या आत्म्याशी प्रामाणिक राहून हवं तसं स्वान्तसुखाय जगत रहावं , तसंच ऋणानुबंधी नातीही , मैत्र सदैव जपत रहावित.* *सत्कर्माची सत्शील कास धरून जीवन अंगीकारताना हृदयस्थ विवेकी भावनांचे भान ठेवून स्वानंदे जगावं.* *कुणाला आवडो वा ना आवडो..!* मुक्त जगावं , मुक्त रहावं , मुक्त फिरावं , मुक्त चिंतनशील ...