सोमवार दि.२७ जानेवारी २०२५ रोजी कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, मानस सेवा केंद्र, मायको हॉल सिडको नवे नाशिक येथे मोठ्या उत्साहात पुरस्कार सोहळा व कवी संमेलन पार पडले. या सोहळ्याचे आयोजन साहित्यरंग साहित्य मंच नाशिकच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा.रविकांत शार्दुल, स्वागताध्यक्षपदी नाशिकचे ज्येष्ठ कवी मा.सुभाष उमरकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका मा.सौ.इंदिरा जाधव जळगाव तर प्रमुख पाहुणे मा.हर्षवर्धन संजय सोनवणे, मा.सुहास टिपरे, युवा उपस्थिती मा.अश्विनी सांगळे, युवा कवी वक्ते व्याख्याते सुशीलकुमार देवराव शिंदे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २१ व्यक्तींना समाज सेवा सन्मान, साहित्यरत्न, नारी रत्न असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी कविवर्य अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार - २०२५ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गरीब विद्यार्थ्यांना पेन, बुक भेट देणे, उन्हाळ्यात गावामध्ये पक्षी वाचवा अभियान राबविणे, गोर गरीब लोकांना मोफत रक्त मिळवून देणे, झाडे लावा झाडे जगवा अभियान राबविणे तसेच सण २०१९ मधील मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ बघून औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पक्षी वाचवा अभियान राबविले होते. या सामाजिक कार्याची दखल घेऊन साहित्यरंग साहित्य मंच नाशिक या संस्थेच्या वतीने अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समाज प्रबोधनकार तथा हास्य कवी प्रशांत दामले पिंपळोद, जेष्ठ साहित्यिक नागोराव सोनकुसरे नागपूर, गणेश वसावे नंदुरबार, कु.कावेरी मदने, रेखा पेटारे, गझलकार यशवंत पगारे, स्वाती सोनवणे, शब्दस्वरा मंगरुळकर अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक कवी कवयित्रींनी या संमेलनात सहभाग घेतला होता. मा.सुशीलकुमार कुमार शिंदे यांनी अथक परिश्रमातून अत्यंत उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन केले. डॉ.विजयकुमार शिंदे पाटील यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र, युवा लेखक तथा कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार - २०२५ हा पुरस्कार मिळाल्याचे समजताच मित्र पंकज वाळके, अतुल वाघरे, लंकेश समर्थ, पंकेश वाकुडकर हे मित्र मंडळ, गावातील नागरिक व आप्तेष्टांकडून त्यांचे भरभरुन कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment