Skip to main content

काव्य दरबार उरण.. पोपटी कवी संमेलन

 
 नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार     
काव्य दरबार उरणचे दरमहा मासिक कवी संमेलन संस्थापक-  श्री. के. एम्. मढवी यांच्या चिर्ले येथील "सुपारी बाग" या निवासस्थानी आयोजित केले जाते. सदर कवी संमेलनाचे *हिरक महोत्सवी पोपटी कवी संमेलन व पुरस्कार वितरणाचे आयोजन संस्थापक के. एम्. मढवी यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक ०२ मार्च, २०२५ रोजी सकाळी- १०:३० ते सायंकाळी- ०५:३० या वेळेत करण्यात आले.
     सर्वप्रथम व्यासपीठ निश्चिती कवी/गायक अरुण द. म्हात्रे यांनी केली. त्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि साई मंदिर वहाळचे विश्वस्त लोकप्रिय माननीय रवीशेठ पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त, धडाडीचे समाज कार्यकर्ते माननीय भूषण पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली. तसेच रत्न साहेब, चंद्रकांत पाटील जी, रामचंद्र म्हात्रे जी, आणि संस्थापक के. एम्. मढवी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व्यासपीठाला विशेष शोभा आली. 
      व्यासपीठ निश्चितीनंतर मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन झाले. आणि कवी/गायक अरुण द म्हात्रे यांनी सुरेल आवाजात गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. एम्. मढवी साहेब यांनी केले. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर आणि उपस्थितांच्या हस्ते पोपटीचे पूजन सुव्यवस्थित केले. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी काव्य दरबारचे सक्रिय कार्यकर्ते श्री हरिश्चंद्र माळी यांच्या जन्मदिनानिमित्त शाल/पुष्पगुच्छ आणि कौतुक प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. प्रमाणपत्राचे वाचन कवी रामचंद्र म्हात्रे यांनी केले. कविश्री अरुण द. म्हात्रे. यांना "जगदंब" पुरस्कार प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार शाल/पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय- रवीशेठ पाटील साहेब यांनी आपल्या मोजक्या शब्दात कवी संमेलन, कवी आणि कवींच्या कविता याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन करून साई मंदिर वहाळ येथे खूप मोठे कवी संमेलन भरवण्याबाबत इच्छा प्रकट केली.
        यानंतर पोपटीचा आस्वाद घेण्यात आला. तदनंतर कवयित्री मिनल माळी यांनी निवेदन करून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थीना पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर आगरी भाकरी-भात-मटन अशा रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. काही शाकाहारींची सोय करण्यात आली होती. याबाबत के. एम्. मढवी आणि त्यांच्या परिवाराचा मोलाचा आणि मोठा वाटा आहे. सर्वांचे भोजन उरकल्यानंतर जे. एन्. पी. टी. चे विश्वस्त आदरणीय भूषण पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कवी कवयित्रींचे कवी संमेलन घेण्यात आले. सु-नियंत्रित सूत्रसंचालन अरुण द. म्हात्रे, रेशमा ठाकूर व सुचित्रा कुंचमवार यांनी केले. यामध्ये अंदाजे ३५ कवी/ कवयित्रींनी वेगवेगळ्या विषयांच्या बहारदार रचना सादर केल्या. 
अध्यक्षीय मनोगतात भूषण पाटील साहेब यांनी साहित्याची गोडी काय असते? तसेच कवींच्या कवितेत किती ताकद असते? तसेच भविष्यात आपण सर्वांनी किती सतर्क आणि कसे जागृत राहायला हवे? याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन अगदी सोप्या शब्दांत केले. त्यानंतर मीनल माळी यांनी आभार प्रदर्शन केले.
         शेवटी कवी/गायक अरुण द. म्हात्रे. यांच्या सुरेल आवाजात आणि पूर्ण शांततामय वातावरणात पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
अशाप्रकारे सदर पोपटी कवी संमेलन सु-नियोजनाने, वेळेत आणि आनंदात पार पडले.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...