राणीसावरगाव येथील ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्षाची व्यथा मांडणाऱ्या कविताचा समूह असलेला रूमणं हा कविता संग्रहाचे प्रकाशन पाठयपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे व काव्यवाणी काव्यसंस्था पुणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजयुवा प्रकाशन पुणे यांनी अप्रतिम काव्यसंग्रह केला आहे आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ मा नंदू वानखडे सर यांनी स्वतःच्या हाताने चित्र काढून माझ्या काव्यसंग्रहाची शोभा त्यांचे गौरव पुंडे सर मनःपूर्वक आभार .या नंतर *महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार, कथा निवेदक, लेखक तथा पाठयपुस्तक कवी श्री हनुमंत चांदगुडे यांचा श्री संगमेश्वर बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 2024 चा महाराष्ट्र भूषण साहित्य गौरव पुरस्कार शॉल श्रीफळ,सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला*,या नंतर कवी हनुमंत चांदगुडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या करिअर बद्दल मार्गदर्शन केले व साहित्याची आवड असणारा विद्यार्थी स्वकर्तृत्वावर यशाची गरुड भरारी घेऊ शकतो असे सांगून त्यानीं लिहलेल्या इयत्ता आठवीतील अळाशी कवितेचा भावर्थ सांगताना म्हणाले की,लेकराला मोठं अधिकारी बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याला शिकवण्यासाठी अत्यन्त हालाकीच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या कष्टकरी बापाला शाळेची परीक्षा फीस भरायला पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करावी लागते या प्रसंगाच वर्णन करताना उपस्थित सर्व विद्यार्थी पालकांच्या डोळ्यातून अश्रूचे बांध फुटत होते.सर्व वातावरण भावनिक झाले होते, उपस्थित सर्व पालक व विद्यार्थी येवढया मोठ्या उंचीच्या पाठयपुस्तक कविला राणीसावरगाव मध्ये आणल्याबद्दल शाळेचेही कौतुक करीत होते. कवी चांदगुडे यांच्या मार्गदर्शनानंतर पुणे येथील निमंत्रीत कवी,कवयत्री सौ,वाणी मॅडम,प्रमोद घोरपडे(कांतासुत) ऐश्वर्या नेहे, चैतन्य काळे, गौरव पुंडे,योगेश हरणे, अक्षय तेलोरे यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय या शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या . कविता कशी लिहावी यांचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले तर कोल्हापूर येथील कवी लेखक सागर पाटील यांनी उत्कृष्ठ असे एकपात्री नाटीकेचे सादरीकरन केले, *या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छत्रपती विद्यालयाचे सचिव श्री शिवसांब कोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे सहशिक्षक श्री डालपे सर व उत्कृष्ट सूत्रसंचालक शिवव्याख्याते फेम कवी शिवशंकर डोईजड सर, संस्थेचे संचालक मारोती अप्पा कोरे, मा.सरपंच विद्यासागर घडे, तुकाराम दादा हाके,तसेच दिलीप मुंडे, फेरोज शेख सर, गोविंद जाधव सर हे होते*, या कार्यमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री गणाचार्य मॅडम व उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री व्यंकट कदम सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली, या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन श्री केशव हाके सर यांनी केले तर आभार सौ. तापडिया मॅडम यांनी केले, शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांना जेवणाची सोय केली व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा. बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा. हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...
Comments
Post a Comment