आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात.
माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा
आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.
बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा
स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.
हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर आहे ते जगता यायला हवं दुसऱ्या साठी जगायला हवं तेंव्हाच मनुष्य मूर्ती रूपाने गेला तरी किर्ती रूपाने कायम राहतो. जीवनाचा अर्थ ज्याला कळतो तो आमरत्व प्राप्त करून जातो त्यांना कोणीही विसरू शकत नाही जसे आपले रतन टाटा जी, सिंधुताई सपकाळ असे अनेक आहेत ज्यांनी चंदनासारखे झिजून दुसऱ्याला सुंदर जीवन दिल.
संसार वेलीवरही सुख दुःख फुलूनी फुलावे
संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्षवावा
संसाराची वेल नाजूक आणि कठीण असते सुख दुःख अपार असतात त्याही पलीकडे जाऊन ते फुलावावे लागतात संसार प्रेमाने हळू हळू बहरत
जातो फुलत जातो संयम त्याग एकमेकांची साथ असेलतर फुलत जातो हार न मानता फुलावावा लागतो
पूर्वी एक म्हण होती " संसार सुई वरून बारीक आणि मुसळहून ठोसर आहे " काटकसर, तडजोड, नियोजन करून संसार पुढे न्यावा लागतो.
सुख न सांगता जीवनाचा हा संदेश दुःखीत मनांना आनंद देईल असे करावे आपलं सुख सांगून इतरांना दुःख देण्यापेक्षा आपण काय करून कुठले दुःख भोगून संकटांचा सामना करून इतपर्यंत पोहचलो याची जाणीव करून प्रेरणा द्यावी.
जीवनाची कहाणी सांगावी म्हणजे दुःख सहन करण्याची ताकद मिळते.
जीवनी जगता हसूनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा
हसता हसता परंतू गतकाळ ही आठवावा
आपण जीवन हसत जगत आसलो तरी इतरांच्या सुख दुःखाला प्रतिसाद देता आला पाहिजे त्यात सहभागी होता आलं पाहिजे. सुखमय सगळे होतात दुःख वाटून घेता आलं पाहिजे सुखात सगळेच बरोबर असतात दुःखात राहता आलं पाहिजे हाच जीवनाचा सार आहे हाच जीवनपट आहे.
आपल्याला सुख आल्यावर चेहऱ्यावर हसू आल्यावर आपला भूतकाळ आठवत राहिलं पाहिजे म्हणजे पाय जमिनीवर राहतात व माणूस माणसा सारखा वागतो त्याला गर्व अहंकार शिवत नाही मी पणाची बाधा होत नाही आपला गतकाळ नेहमी स्मरणात असावा यशाची दिशा आपोआप मिळत जाते.
भुकेलेल्याला अन्न तहणनेलेल्याला पाणी ही आपली संस्कृती जपावी हेच मोठं सुख आणि श्रीमंती.
हे तत्व पळाले तर आनंद मिळेल आनंद वाटता येईल आणि सुगंध किर्ती रूपाने दरवळत राहील
अप्रतिम गीत लिहिले आहे लेखकास विनम्र आभिवादन 🙏🙏
सौ. वृंदा पंकज गंभीर नऱ्हे, पुणे (दत्तकन्या )
Comments
Post a Comment