Skip to main content

वाकडी येथे साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे - संपादक नितीन गायके

नेवासा प्रतिनिधी:- वाकडी ता. नेवासा जि. अहमदनगर येथे साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री. माननीय विठ्ठलराव लंघे पाटील, श्री. निलेश सरोदे, दैनिक साहित्य सेवा संपादक श्री.नितीन गायके, ज्येष्ठ साहित्यिक श्री. सायमन भारस्कर,श्री कचरू गाढे,  श्री. अंकुश काळे वाकडी गावचे सरपंच संभाजी काळे हे मान्यवर उपस्थित होते.  तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात नितीन गायके सर यांच्या परखड भाषाशैलीने झाली. ज्यांनी समाजासाठी लढा दिला आपले जीवन समाजासाठी खर्च केले या महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे. क्रांतिकारक बदल झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी निर्मित केलेले साहित्य वाचावे.  तसेच या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करा परंतू त्याआगोदर  प्रथम त्यांचा अभ्यास करा व आपल्या वर्तनात बदल आणा. त्यांचे विचार समाजात पेरा तरच आपण जयंती पुण्यतिथी साजरी करून आदरांजली वाहिली असे म्हणता येईल. साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे हे साहित्यिक सर्व जाती धर्माचे होते,मानवता हाच त्यांचा धर्म  असे विचार श्री नितीन गायके सर यांनी मांडले व मान्यवरांची, श्रोत्यांची मने जिंकली. 
श्री. मुकुंद भगत यांनी साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांचे विचार पटवून दिले.
ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर यांनी साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांचा जीवन परिचय आपल्या मधुर शब्दात सांगितला.
भाजपा जिल्हाध्यक्ष मा. विठ्ठलरावभाऊ लंघे यांनी आपले मार्मिक विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग मोहन काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. नामदेव वडागळे
श्री. भगवान वडागळे श्री. मारुती वडागळे श्री. आकाश वडागळे श्री. अनिल शिरसाठ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...