Skip to main content

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची


        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचंही आहे.याच खोलीत जमीनीवर बसून त्यांच्या सहवासात मस्त दोन अडीच तास आमच्या गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या अनेक प्रसिद्ध कविता त्यांच्या मधुर वाणीने सादर केल्या.आम्ही त्यांच्यासमोर मांडी घालून बसून त्यांच्या भरपूर कविता ऐकल्या.
 *'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे '* यांनी बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात *पोर डोंगरावर भाळली* ही कविता व इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील *वनवासी* कविता तसेच कला शाखेतील इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात तुकाराम धांडे सरांच्या जीवनावर आधारीत त्यांच्या *जीवनाचा संघर्ष* हा पाठ अशा दोन कविता व एक पाठ महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमासाठी आहे.याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दर वर्षी घेत आहेत.तुकाराम धांडे सर हे अगदी हळव्या मनाचे निसर्गावर अपार प्रेम करणारे *रानकवी* आहेत. धांडे सर आजवर असंख्य काव्य संमेलनात मानाच्या स्थानी प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान झाले आहेत.अनेक अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून राहिलेले आहेत.
बॉलिवूड व टॉलीवूड सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सयाजी शिंदे व नाना पाटेकर हे कलाकार तुकाराम धांडे सरांच्या कवितेचे चाहते आहेत. अनेक स्टेज शो च्या कार्यक्रमात या कलाकारांनी त्यांच्यासोबत त्यांच्या कविता एकत्रित प्रेक्षकांसमोर सादर केलेल्या आहेत. धांडे सरांची *भूगोल* ही कविता सातासमुद्रापार म्हणजेच अमेरीकेमधील माजी राष्ट्राध्यक्ष सर *बराक ओबामा* यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांना ही कविता अपार आवडलेली आहे. ही कविता वाचून बराक ओबामा धांडे सरांच्या कवितांचे चाहते झाले आहेत. 
     भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ *शिमला* येथे होणाऱ्या राष्ट्रीय काव्य संमेलनात रानकवी धांडे सर यांनी आपली माय बोली मराठी कविता  आपल्या भाषेत आपल्या शैलीत सादर करून  अनेक दिग्गज कवींना त्यांच्या कवितेची भुरळ  घालायला लावतात. ही जादू आहे कवितेची, त्यांच्या हळव्या स्वभावाची, आणि  त्यांच्या मधुर वाणीची. त्यांचे डोंगरावर एकंदरीत निसर्गावर असलेल्या अपार निस्सीम प्रेमाची.
अशा अवलियाला भेटून मला अपार आनंद झाला. त्यांच्या सहवासातील दोन - अडीच तास कसे निघून गेले काही कळलं नाही. पुन्हा त्यांच्या भेटीची ओढ मनात साठवत त्यांचा स्नेह व अनुभव घेऊन आम्ही तिघं  विजय सर, पारधी सर व मी संतोष जाधव घरी निघण्यास मार्गस्थ झालो.
धन्यवाद धांडे सर...
आम्हा तीन कवींना आपला अमूल्य वेळ दिलात.आपल्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या कवितांचा आशीर्वाद आम्हा नवकविंना दिलात.
 मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो... धन्यवाद...

संतोष रामचंद्र जाधव 
बोरशेती परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर ठाणे 
7507015488ज

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...