Skip to main content

*"कवितेच्या पारावर" प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा दुसरा शुभारंभी प्रयोग संपन्न*


ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते.

        हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती.‌ या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. 

         कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या या मैफिलीची गोष्ट तशी थोडी निराळी पण रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. "कवितेच्या पारावर" या नावाप्रमाणेच पारावर जमलेल्या कवींनी स्वर व शब्दांच्या साथीने ही मैफिल सजविली. निसर्गकविता, भावकाव्य, प्रेम-विरह, बोलगाणी, गीतगायन त्याप्रमाणे भारूड व गझल अशाप्रकारे कवितेच्या विविधांगी छटांचे येथे सादरीकरण करण्यात आले. मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन देखील तितक्याच ताकदीने कलाकारांच्या भूमिकेत स्पष्ट जाणवत होते.

         या मैफिलीत स्वाती भोसले,डॉ.पुनम महाजन, आनंद रांजणे, संगीता काळभोर, महेश भोसले, काव्या भोसले, निती गद्रे, अक्षता गोसावी, रश्मी राऊत, प्रसाद माळी, सचिन पाटील, श्रावणी गोसावी, जिनिशा राऊत, ज्योती माळी, राधा गानू इत्यादी कवी, कवयित्री तसेच कलाकारांनी उत्कृष्ट सहभाग घेऊन आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले.

         अशा या रंगतदार कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री/ शिक्षिका तसेच जिजाई बालमंदिर ठाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. ऋतुजा गवस मॅडम लाभल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग अनुभवण्याचा एक उत्तम योग जुळून आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मैफिलीत उत्तरोत्तर रंगत वाढत गेली त्यांनी लिहित्या हाताला लेखणीची सवय लागावी म्हणून डायरी तसेच लेखणी सर्व कवींना भेट स्वरूपी प्रदान केली. तसेच शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रबोधनपूर्वक ठरले. मैफिलीला कवयित्री/ लेखिका/ शिक्षिका मा. कल्पना देशमुख या अध्यक्षस्थानी लाभल्या होत्या. त्यांच्या भारूड गायनाने मैफिलीत शोभा आली व मान्यवरांचा उत्साह द्विगुणित झाला. या मैफिलीचे संकल्पनात्मक आयोजन करून कवी अनुकूल माळी यांनी आपल्या बहारदार शैलीत त्रिसूत्री सुत्रसंचालन केले व आयोजक कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा या रंगतदार मैफिलीत कवितेच्या पारावर रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात एक आनंददायी सायंकाळ अनुभवण्याचा उत्तम योग आला. 

-- प्रदीप बडदे, (नवी मुंबई)

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...