सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी बोगस विवाह संस्थेचे जाळे पसरले असल्याने गरजू वधूवरांच्या पालकांनी त्या पासून सावध रहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.या बोगस विवाह संस्था प्रथम गरजू वधू वरांच्या पालकांशी संपर्क साधतात, त्यांच्या अपेक्षा विचारुन घेतात,त्याच प्रमाणे मन मानेल तशी फी आकारली जाऊन बोगस विवाह संस्थेत नाव नोंदणी केली जाते.अपेक्षित स्थळांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर, पत्ता, घेऊन ते गोपनीय ठेवले जाते.व समोर पालकांना सांगतात " तुम्हाला हवे तसे स्थळ आलेले आहे.आम्ही बैठक घडवून आणतो, त्या आधी तुम्ही बैठकीची अमुक अमुक रक्कम जमा करावी.गरजू पालक पैसे जमा करतात, पुन्हा विवाह संस्था बैठकीच्या आयोजनाचे वेळी वेगवेगळी कारणे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करतात.यात पालक फसतात.मोबाईल वरुन विवाह संस्थेशी संपर्क केला असता "आपण नंतर संपर्क करा" म्हणून कळविले जाते, किंवा फोन उचलला जात नाही,अशा बोगस विवाह संस्थेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.पुणे, मुंबई, मुंबई उपनगरे,लातुर, सोलापूर, सातारा,या ठिकाणी व पश्चिम महाराष्ट्र मधील काही ठिकाणी अशा बोगस विवाह संस्था असल्याचे निदर्शनास आले आहे.पुणे हडपसर येथील शुभ मंगल विवाह संस्थेनी अनेक पालकांना फसविले आहे.नाव नोंदणी पूर्वी गोड बोलून लग्न जमविण्यासाठी उत्सुकता दाखवतात,व विवाह संस्थेची फी भरल्यानंतर टाळाटाळ करतात.पण गरजू वधूवरांच्या पालकांनी मात्र यां बोगस विवाह संस्थे पासून सावधानता बाळगावी, विवाह संस्थेच्या गोड गोड बोलण्यावर विश्वास नये.सुंदर मुलींचे व सुंदर मुलांचे फोटो व परिचय गरजू वधूवरांच्या पालकांना पाठविला जातो,व तुम्हाला त्या स्थळाचा होकार आहे असे सांगितले जाते, परिचय मध्ये पालकांचे एकमेकांना संपर्क करण्यासाठी पत्ता व मोबाईल नंबर नसतो, पुन्हा बोगस विवाह संस्था पालकांना पैसे जमा करायला सांगतात, बैठकीच्या आयोजन दरम्यान कोणते तरी कारण सांगून नकार दिला जातो.भरलेले पैसे परत मिळत नाही, पुन्हा गरजू वधूवरांच्या पालकांना पुढील स्थळाचा खोटा विश्वास दिला जातो, सुंदर मुलींचे व सुंदर मुलांचे फोटो पसंत पडणाराच असतो , बोगस विवाह संस्था फसवे गिरी करत असतात.पालकांना एकमेकांना संपर्कात येऊ देत नाहीत, मध्यस्थी करून पैशाची मागणी करत असतात.बिचारे गरजू वधूवरांच्या पालक फसतात.
आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा. बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा. हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...
Comments
Post a Comment