Skip to main content

Posts

संत एकनाथ

शांती ब्रम्ह रूप!एकचं प्रारूप! अवतार रूप! एकनाथ!!1 जन्मचं पैठणी! विद्या वान गुणी! होतीच सुवाणी! धर्मज्ञानी!!2 भक्ती अंगी भिने! शक्ति रूप भासे! प्रभोधन दिसें! वाणीतून!!3 हरी भरी पाणी! संत होते गुणी  अभंग गौळणी! रचिल्यात!!4 आदर्श वागणं! सुंदर जगणं! साधंच राहणं! जीवनात!!5 सांप्रदाय नाथ! जनार्धन स्वामी! ज्ञान  आलं कामी! जगण्यात!!6 मी आणि तु भेद! नष्ट कर्ते झाले! कार्य खुप केले! जीवनात!!7 प्राणी मात्रा जीव! एकच सारेच! वाहिले वारेच! ज्ञानातुनी!!8 संत एकनाथ! उभय राष्ट्रात  सांगे अभंगात! प्रदीपचं!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

अमरावतीच्या संस्थेचा विनोद अष्टुळ यांना महाराष्ट्र भूषण

पुणेः प्रतिनिधी अमरावती येथील कला जीवन बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉ अलका नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हडपसर येथे बहुभाषिक द्विशतकीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले . संमेलनाध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे शहराध्यक्ष रा.काँ.( शरद चंद्र पवारगट) प्रशांतदादा जगताप, माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ गजलकार म भा चव्हाण, प्राचार्य सूर्यकांत वैद्य, कविसंमेलनाध्याक्षा प्रतिभाताई मगर, समाजसेवक दादासाहेब सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.        साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ व संस्थेच्या सचिव सौ.अर्चना अष्टुळ हे गेली तेरा वर्षापासून कवी कट्टा  अव्याहतपणे सुरु ठेवला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठीची रात्रदिवस सेवा करत आहेत म्हणूनच या संस्थेच्या वतीने   पुरस्कार देवून   गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सम्राट च्या सदस...

प्रदीप बडदे यांना मराठी साहित्य मंडळाचा कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला.

             ठाणे: नवी मुंबईतील कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांना नुकताच मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचे ते कार्यकारी संपादक असून मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात येथील विविध साहित्यिक मंचावर संचालक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप बडदे हे गेल्या वीस वर्षांपासून साहित्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व राष्ट्रस्तरीय अशी ४० हून अधिक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त आहेत.              रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, रेगे सभागृह, ठाणे येथे ज्येष्ठ साहित्यिक मा.अशोक बागवे, मा.डॉ. विनायकराव जाधव, मा. सिद्धार्थ कुलकर्णी, मा.जयप्रकाश घुमटकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन मराठी साहित्य मंडळ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कवडे यांनी मोठ्या थाटात केले आहे. सूत्रसंचालन अनघा जाधव व विद्या थोरात काळे करणार आहेत.

जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या  जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.  बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ.  अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा,  काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ.  सापळे आणि विशेष अतिथी,  श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून  आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय विद्यार्थी यांनी देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे जे रुग्णालयात प्रमुख अतिथी म्हणून सौ. वर्षा वराडे यांचा सन्मान

जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा  ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या  जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.  बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ.  अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा,  काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ.  सापळे आणि विशेष अतिथी,  श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून  आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टा...

आपली सुरक्षा

 करू स्वतःचं सुरक्षा  धडे घेऊ आत्मरक्षा  कमवु शरीर यष्टी  तत्पर असूत रक्षा. सोबत इतरांचीहि  घेऊ काळजी सारीच  दृष्ट्रावर पडु भारी  मित्र मैत्रीत यारीच. लढायची ती तयारी  एक राहू सारी जन  सु राष्ट्र करू निर्माण  ठेवुत शांतीचं मन. वसाच सुविचारांचा  निर्माण करू माणसा  साथ देऊ दिन दुःखी  झोडपू दृष्ट दिवसा. शक्ति करू बळकट  हात घेऊन हातात  वार करतं पोटात  वावरू सारी थाटात.©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव  मो. 9922239055

महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन व पोलीस यांचा वचक राहिला नाही... पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली

सध्या महाराष्ट्रातील गुन्हेगारांना शासन आणि पोलीस यांचा पाहिजे तसा वचक राहिला नाही असे प्रतिपादन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केले आहे.संतोष देशमुख निघृण हत्या, कैलास बोराडे यांच्या शरीरावर दिलेल लोखंडी रॉड चे चटके, स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अन्याय, वगैरे वगैरे घटनांनी लोक हादरलेले आहेत,अशा घटना म्हणजे राज्याला एक प्रकारे लागलेला कलंक आहे,या घटनेतील काही आरोपी पोलिसांना अजून सापडलेले नाहीत,ही अत्यंत खेदाची बाब आहे, अन्याय झालेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची आहे ,यांचा विचार न करता ती एक व्यक्ती आहे,यांची जाणीव ठेवावी.माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संवेदनशील मनाचा थरकाप उडविते, ज्या समाजातील व्यक्ती वर अशा प्रकारे अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने त्याचा समाज उभा राहून न्याय मागत असेल तर बिघडले कुठे? पोलीस व शासन यांनी यांना आवर नाही घातला तर ते आणखी निर्भिड,बेडर होऊन दुसरे गुन्हे करतील.अशा गुन्हेगारांना वेळी च अटक करुन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,