Skip to main content

*डॉ खंडू माळवे(खं र माळवे -खरमा)यांना जीवनगौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्राप्त*

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे -खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला.ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे देण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भुषविले उदघाटक मां प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे -खरमा यांचेहस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उदेशिकेचे वाचन केले यावेळी रविवार दि २५/०८/२४रोजी प्रमुख पाहुणे म्हणून नासा शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजल्स पद्मश्री डॉ जी.डी.यादव(अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार दै प्रहार संपादक सुकृत खांडेकर बी.पी.ई.हायस्कुल बांद्रा मुख्याध्यापक भानुदास केसरे नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडक, उद्योजक राजेश कांबळे आणि वूमेन्स इंडिपेंडेड फोरएहरच्या संस्थापिका डॉ नॅन्सी अलबुकर्क रामकृष्ण कोळवणकर उपस्थिती लाभली यावेळेस डॉ खं र माळवे -खरमा यांना साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कार तसेच निमशासकीय पुरस्कार यादी प्राप्त आहे नुकताच साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व फेमगौरव पत्र, स्मरणिका,अधिक विषेशांक कवी सरकार विलास पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे एकूण शंभर पुस्तके लिखित एकाच वेळी प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे या अगोदर महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाने काव्यसंग्रह "चाळणीवाला"२०१३ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्रीमंडळ यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले आजवर ५००० पाचहजार कविता (मराठी हिंदी) लिहून वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड,OMG बुक ऑफ रेकॉर्ड,भारत बुक ऑफ रेकॉर्ड, हिंदूस्थान बुक ऑफ रेकॉर्ड, सर्वोच्च गिणिज बुक ऑफ रेकॉर्ड करण्याचा मानस आहे या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने डाक विभाग पाच रूपयांचे स्टॅम्प टिकिट जारी केले २०१५आजवर गीत,लावणी,शाहिरी पोवाडे, बालगीते,प्रेमविरापासून तेसंतसाहित्यापर्यंत सामावेश आहे त्याचप्रमाणे बालगीत "अंगाईत" प्रकाशित आहे बाळासाहेब बेल्हेकर तमाशा मंडळ गीत लावणी गात आहेत हा पुरस्कार माझा नसुन सर्व चाहते वर्ग व साहित्यिक कवी संपादक यांचा आहे असे डॉ खं र माळवे यांचे मत आहे त्यांनी आजवर हिंदी मराठी इंग्रजी साहित्यात त्यांचें अनमोल असे विचार मांडून समाजप्रबोधन करीत आपल्या जल्मभूमि कर्मभूमीत आणि महाराष्ट्राच्या मातीत आपल्या विचाराने देशाच्या जडणघडणीत सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आपल्या कर्मभूमीत आपण विविध विषयांवर लेखन करून तळागाळातील जनतेशी नाळ जोडून समाजाच्या विविध पैलूचा ग्रामीण जीवनातील शैलीचा मागोवा घेत समाज परिवर्तनासाठी आपण जी का जपली आहे या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती सदस्य प्रा नागेश हुलवळे, रमेश पाटील व प्रमोद सुर्यवंशी ,योगेश हरणे,यांनी केले तर सुत्रसंचलन योगीता पावले यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली
प्रेस नोट

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...