शनिवार दिनांक ३१ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरीवली येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र,स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह, फुलपाखरू उद्यान, बोरीवली पूर्व या ठिकाणी विमूक्त घुमंतू जनजाती विकास परिषद ( अ.भा.)यांचे वतीने विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.३१ आगस्ट विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.निहारिका खोंदले सचीव भाजपा मुंबई,व अध्यक्षा धनगर समाज एकता मंडळ, बबनराव मोहिते उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, प्रमुख उपस्थिती भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम साहित्यिक व पत्रकार,लहू पवार सदस्य, मी वडार महाराष्ट्राचा,सौ.अर्चना लष्कर महिला अध्यक्षा मी वडार महाराष्ट्राचा, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या विमुक्त दिनाचे निमंत्रक सहदेव रसाळ अध्यक्ष मुंबई गिरीधर साळुंखे कार्यवाह मुंबई, महादेव रसाळ, मंगेश शिंगे,धृपद रवंदळे,उमेश जोशी, अशोक वाडेकर,मोहन अलकुंटे, संदेश रसाळ, गंगाराम क्षिरसागर,सुजीत गोसावी आदी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.
आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा. बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा. हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...
Comments
Post a Comment