Skip to main content

*जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई कौन्सील) तर्फे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई येथे जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

परिषदेसाठी प्रमुख वक्ते सुरेश सावंत हे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे असणार आहेत.

प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणात त्यांचा योग्य वाटा मिळावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की हा डेटा विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संसाधनांचे प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आवश्यक आहे. ही मागणी जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही परिषद मोठ्या जनआंदोलनाचा भाग आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने आणि मोर्चे काढले आहेत. या महत्त्वाच्या विषयासाठी सर्व इच्छुक व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...