Skip to main content

*नागपंचमी निमित छोटासा लेख*


आपल्या भारत देशामध्ये वैविध्य जाती, धर्म, संप्रदाय आणि पंथाला माणनारी माणसं, आनंदाने मिळून मिसळून राहतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग होळी, दिवाळी, दसरा आणी त्याचप्रमाणे प्रत्येक सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. तसाच एक आपला पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण गावाप्रमाणेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रियामंडळी एकत्र येऊन जंगलात अथवा गावालगत असणाऱ्या वारुळाची पुजा करतात 
आणि त्या वारुळाजवळ दूध ठेवल्या जाते.
किंबहुना वारूळ हे वाळवी व मुंगीचे निवासस्थान आहे. आणि कधी कधी सापही आपला आसरा शोधतो आणि सुरक्षिततेसाठी वारुळात राहतो. पण जे दूध आपण वारुळासमोर सापाला पिण्यासाठी ठेवतो ते आता कुठेतरी थांबवले पाहिजे आणि टाळले पाहिजे. किंवा सापाला दूध पाजणे हे बंद केले पाहिजे. कारण मुळात दूध सापाचे खाद्य नाहीच आपण सापाला दूध पाजतो जे सापाचे पेय अन्न नाहीच. दुसरीकडे दूध पाजल्याने सापाच्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि तो लवकरच मरतो दूध सापांना पचत नाही, साप हा मांसाहारी जीव आहे. सापाचे सर्वात जास्त आवडते खाद्य हे उंदीर, बेडूक, पाल, कीटके आहेत. जे शेतातल्या पिकांची हानी करतात त्यांना साप खातो एकंदरीत साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. दूध हे सापांचे खाद्य नाहीच ही गोष्ट यापुढे लक्षात घेऊन सर्वप्रथम समाजात प्रचलित असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पप्रेमीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पमित्राने प्रयत्न केले पाहिजे. आज नागपंचमीच्या दिवशी आपण ठाम निर्णय घेऊ की आजपासून आपण जेथे सापाला वाचवण्यासाठी जाऊ तेथे गावातील लोकांना त्या ठिकाणच्या नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवू जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजणे बंद होईल. आणी कुठेही साप अथवा वन्यजीव प्राणी धोक्यात अथवा जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या वन्यजीव प्रेमेशी संपर्क साधून. त्या जीवाला जीवदान देण्याचे आवाहन देखील करण्यात यावे. 
कारण या पृथ्वीतलावावर प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणी प्रत्येक घटक हा निसर्गाचा भाग आहे सापाचे प्राण्याचे वन्यजीवाचे संरक्षण व्हावे हा उद्देश असलाच पाहिजे. दिवसेंदिवस सापांची वन्यजीवांची संख्या पर्यावरणास कमी होत आहे. आणि आपल्याकडे साप निघाला असता किंवा एखादा वन्यजीव आढळल्यास त्याला न मारता वन्यप्रेमींना बोलवून त्याला योग्य ठिकाणी त्याच्या अधिवासात मुक्त केले पाहिजे. म्हणजेच निसर्गातील समतोल ढासळता कामा नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे
प्रेम, करुणा, बंधुभावनेने कुणावरही विजय प्राप्त करता येते, जिंकता येते हे नागवंशीयांची नागपंचमी आपल्याला शिकवते धन्यवाद...

वन्यजीवरक्षक 
दुशांत शेळके
पगमार्क वाईल्ड लाईफ 
फाउंडेशन यवतमाळ

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...