आपल्या भारत देशामध्ये वैविध्य जाती, धर्म, संप्रदाय आणि पंथाला माणनारी माणसं, आनंदाने मिळून मिसळून राहतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग होळी, दिवाळी, दसरा आणी त्याचप्रमाणे प्रत्येक सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. तसाच एक आपला पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण गावाप्रमाणेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रियामंडळी एकत्र येऊन जंगलात अथवा गावालगत असणाऱ्या वारुळाची पुजा करतात
आणि त्या वारुळाजवळ दूध ठेवल्या जाते.
किंबहुना वारूळ हे वाळवी व मुंगीचे निवासस्थान आहे. आणि कधी कधी सापही आपला आसरा शोधतो आणि सुरक्षिततेसाठी वारुळात राहतो. पण जे दूध आपण वारुळासमोर सापाला पिण्यासाठी ठेवतो ते आता कुठेतरी थांबवले पाहिजे आणि टाळले पाहिजे. किंवा सापाला दूध पाजणे हे बंद केले पाहिजे. कारण मुळात दूध सापाचे खाद्य नाहीच आपण सापाला दूध पाजतो जे सापाचे पेय अन्न नाहीच. दुसरीकडे दूध पाजल्याने सापाच्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि तो लवकरच मरतो दूध सापांना पचत नाही, साप हा मांसाहारी जीव आहे. सापाचे सर्वात जास्त आवडते खाद्य हे उंदीर, बेडूक, पाल, कीटके आहेत. जे शेतातल्या पिकांची हानी करतात त्यांना साप खातो एकंदरीत साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. दूध हे सापांचे खाद्य नाहीच ही गोष्ट यापुढे लक्षात घेऊन सर्वप्रथम समाजात प्रचलित असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पप्रेमीने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक सर्पमित्राने प्रयत्न केले पाहिजे. आज नागपंचमीच्या दिवशी आपण ठाम निर्णय घेऊ की आजपासून आपण जेथे सापाला वाचवण्यासाठी जाऊ तेथे गावातील लोकांना त्या ठिकाणच्या नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवू जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजणे बंद होईल. आणी कुठेही साप अथवा वन्यजीव प्राणी धोक्यात अथवा जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या वन्यजीव प्रेमेशी संपर्क साधून. त्या जीवाला जीवदान देण्याचे आवाहन देखील करण्यात यावे.
कारण या पृथ्वीतलावावर प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणी प्रत्येक घटक हा निसर्गाचा भाग आहे सापाचे प्राण्याचे वन्यजीवाचे संरक्षण व्हावे हा उद्देश असलाच पाहिजे. दिवसेंदिवस सापांची वन्यजीवांची संख्या पर्यावरणास कमी होत आहे. आणि आपल्याकडे साप निघाला असता किंवा एखादा वन्यजीव आढळल्यास त्याला न मारता वन्यप्रेमींना बोलवून त्याला योग्य ठिकाणी त्याच्या अधिवासात मुक्त केले पाहिजे. म्हणजेच निसर्गातील समतोल ढासळता कामा नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे
प्रेम, करुणा, बंधुभावनेने कुणावरही विजय प्राप्त करता येते, जिंकता येते हे नागवंशीयांची नागपंचमी आपल्याला शिकवते धन्यवाद...
वन्यजीवरक्षक
दुशांत शेळके
पगमार्क वाईल्ड लाईफ
फाउंडेशन यवतमाळ
Comments
Post a Comment