Skip to main content

*नागपंचमी सण*

श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते.

*श्रावणे शुक्लपंच्यम्यां यत्कृतं नागपूजनम् ।*
*तने तृप्यंन्तु मे नागा भवन्तु सुखदा: सदा ।।*

भारतीय संस्कृतीत धार्मिक व्रतवैकल्ये , सणवार उत्साहाने आणि श्रध्येने साजरी करण्याची परंपरा अनादिकालापासून आहे. त्या सणांना हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे. या सर्वच सणाबाबत हे सण उत्सव कां केले जातात , त्याची पार्श्वभूमी काय ? त्याचे दृष्टांत कोणते याची सारी महती पुराणकाळापासून हिंदूधर्मातील ग्रंथातून , अगदी देवदेवता ,ऋषीमुनी यांच्या काळापासून अनेक कथांमधून , अनेक आपल्या प्रत्ययास येते. तसेच पुरातन कालापासून देवदेवतांच्या प्रतिकांची श्रद्धेने पूजा करण्याची प्रथा देखील आजही प्रचलित आहे. पण या सर्वांमध्ये प्रत्येक सण , उत्सवांच्या मागे  संस्कारांचं , संस्कृतीच , तसेच शास्त्रीय कारणे सुद्धा  आहेत असे मानले जाते.
या साऱ्या सणांच्या बाबतीत अनेक पौराणिक आख्यायिका , दंतकथा आहेत आणि त्या सर्वश्रुत आहेत.

*नागपंचमी हा असाच श्रावण* *महिन्यातील सण भारतात साजरा केला जातो.*
नाग हे भगवान शंकराच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे , भगवान विष्णूलक्ष्मी यांची शय्या असून विष्णू नागावर विराजमान आहेत असे दिसते. आणि पशु ,पक्षी , प्राणी यांचा मानवी जीवनाशी खूपच जवळून संबंध आहे. हे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. तेंव्हा बैलपोळा , नागपंचमी , गोपूजा ( वसुबारस ) ऋषीपंचमी , असे इतर अनेक जे  सण मानले जातात त्यांची त्या त्या श्रद्धेनुसार त्या श्रद्धेच्या महत्वानुसार त्या त्या दिवशी यथायोग्य पूजा करण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे. त्यामागे धार्मिक , सामाजिक शास्त्रीय कारणे देखील आहेत. आणि उत्सवांची नाती श्रध्येय , देवधर्म या संकल्पनेशी आस्थेने जोडलेली आहेत. अप्रत्यक्षात नैसर्गिक पर्यावरणाशी जोडलेलं ही नाती आहेत. 
भारतीय संस्कृती भावनिक , दैविक श्रद्धेशी निगडित आहे. *त्यामुळे साऱ्या निसर्गाला , साऱ्या सृष्टीला भारतीय संस्कृतीत परमेश्वराच्या रुपात पाहिलं जातं..!*
आणि बैल ( नंदी ) , मोर , वाघ , सिंह नाग , वराह , मत्स्य , गरुड , उंदीर , श्वान अशा अनेकांना दैवी प्राण्यांच्या श्रेणीत गणलं गेलेलं आहे. म्हणून नागला देखील  दैवीप्राणी समजले असून *नागपंचमीची पूजा  म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी हा सण मानला आहे म्हणूनच नागपंचमीच्या पूजेचे महत्व आहे.*

प्राचीन आख्यायिकेत भगवान कृष्णाशी *कालियामर्दन ही कथा निगडित आहे.* ती सर्वश्रुत आहे. आपण सर्वांनी ती ऐकली आहे. त्या कथेत कालिया या *महाकाय सर्पाचा भगवान श्रीकृष्ण लोकरक्षणासाठी पराभव करतात. आणि त्यावेळी तो सर्पराज कालिया श्रीकृष्णाला शरण येतो. आणि तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी असल्यामुळे *नागपंचमी* हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि नागदेवतेची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत ज्योतिष शास्त्राचा देखील उल्लेख आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे शास्त्रानुसार कुंडलीच्या अभ्यासानुसार अनेक पद्धतीने भविष्य वर्तविले जाते. त्यात कुंडलीतील बलस्थान किंवा दोष वर्तविले जातात. त्याला उपाय देखील सांगितले जातात पण हा विश्वासाचा , श्रद्धेचा विषय आहे. कुंडलीत अनेक योग दाखविले आहेत. त्यामध्ये *कालसर्प* हा दोष असलेला महत्वपूर्ण योग सांगितला आहे. त्या दोषयुक्त योगापासून मुक्ती मिळावी म्हणून ज्योतिषी पवित्र नदीकाठावर कालसर्प योगाची शांती करण्यास सुचवतात आणि त्यासाठी शास्त्रोक्त धार्मिक विधी करण्यास सांगतात त्यावेळी नागदेवतेची पूजा केली जाते. ही प्रथा आजही सुरू आहे. पण हा श्रद्धेचा भाग आहे. पौराणिक कथेतून पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर ( डोक्यावर ) तोललेली आहे असा उल्लेख आहे.
भारतीय संस्कृतीत अनेकप्रकारे नागांची पूजा केली जाते. भारतीयांनी नागाला देवता मानले आहे. शेतीप्रधान संस्कृतीत नागपूजेला विशेष महत्व दिले आहे. नाग ,साप हे शेताचे रक्षण कर्ते आहेत असे मानले जाते.
*भारतात विविध प्रांतात म्हणजे महाराष्ट्र , राजस्थान , गुजरात , केरळ , तामिळनाडू , आसाम अशा ठिकाणी नागपंचमी उत्सवाने साजरी केली जाते.* 
विशेषकरून स्त्रिया या दिवशी नटून थटून नागाची पूजा करुन गारुडी लोकांनी पकडून आणलेल्या खऱ्या नागाची दूध , लाह्या ,अर्पण करून हळदीकुंकू लावून पूजा करतात.
आधुनिक काळात तांत्रिक विकसित क्षेत्रात आपल्याला या नागपंचमीच्या पूजनाचे महत्व कमी झालेले दिसते. पूर्वी नाग, साप हे विषारी असल्याने नागांची हत्या केली जात होती पण आता सर्पमित्रांच्या साह्याने नागसापांचे संरक्षण केले जाते व त्यांना पकडून इतरत्र जंगलात सोडले जाते .
आज वैद्यकीय क्षेत्रात संशोधना मार्फ़त नागापासून मिळणाऱ्या विषाचा देखील त्याच्या विषातील औषधी गुणधर्मामुळे  अनेक रोगांवर उपयुक्त औषधे बनविली जात आहेत.
काळानुसार वैचारिक बदल होवून अंधश्रद्धा वगळून सण आणि उत्सवांचे योग्य ते बदल घडत आहे. हे स्वागतार्ह आहे. 
*इती लेखन सीमा*....
*****************************
*वि.ग.सातपुते. पुणे.*
*संस्थापक अध्यक्ष:*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान*
*पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र)*
*(.9766544908 )*

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...