आज मूळ श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी' .नागपंचमी म्हटले की आठवण होते ती झाडावर बांधलेल्या झोक्याची,गोड नैवेद्याची .या सणाच्या पारंपरिक कथा सर्वांनाच माहीत आहे. स्त्रिया या सापाला भाऊ मानून त्याची मनोभावे पूजा करतात . परंतु या ठिकाणी भूतदया दाखवणे हाच एक उद्देश आहे .काही गारुडी या मुक्या प्राण्याला टोपलीत बंद करून त्याला जबरदस्तीने दूध पाजून लोकांच्या भावनेशी खेळताना दिसतात. गरीब भोळी जनता या अंधश्रद्धेला बळी पडते . अनेक लोकांचा अंधविश्वास आहे की नागाला दूध पाजण्याने नाग देव प्रसन्न होतात. परंतू हा गैरसमज आहे कारण नाग कधीच दूध पीत नाही. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. नाग दूधच काय कोणताही पेय पदार्थ पीत नाही. चुकीने दूध प्यायला तर त्याची मृत्यू होऊ शकते. मग अशात पूजा काय कामाची? अशाने फल मिळण्याऐवजी मृत्यूचा दोष लागू शकतो. त्या पेक्षा एखाद्या गरिबांच्या मुखी हे दूध गेले तर नक्कीच पुण्य मिळेल.
देवाला किंवा या सापाला काय अर्पण करता हे महत्वाचे नसते.या सर्व दिखाव्याच्या गोष्टी आहेत. मनातील भक्तिभाव महत्वाचा असतो. भुकेल्यांच्या मुखी अन्न घालणे ही सर्वात मोठी देवपूजा आहे असे मला वाटते.
हिरकणी सौ.अनिता गुजर
डोंबिवली
8097524197
Comments
Post a Comment