Skip to main content

दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत18चे सहसंपादक विलास बडे यांची उपस्थिती ठरली खास आकर्षण

पनवेल प्रतिनिधी 
वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधार ने पनवेल शहरांमध्ये दिमाखात पाऊल ठेवले होते दर्जेदार बातम्या व लेख यामुळे वाचकांच्या पसंतीस हे वर्तमानपत्र पडले आहे.
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार या दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा परिणीता फाउंडेशनचे  विशेष सहकार्य  लाभलेला वर्धापन  सोहळा  जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत18 चे  सहसंपादक विलास बडे ऋषिकेश राजकिरण प्रसिद्ध अभिनेता डॉ. नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल  प्रशांत सागवेकर वृत्त निवेदक जय महाराष्ट्र न्यूज चैनल दैनिक युवाक आधारच्या मुख्य संपादक  भारती संतोष आमले यांच्या उपस्थित मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन  डॉ.नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा विभाग संपादक जगन्नाथ रासवे सर यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये जय महाराष्ट्र चॅनलचे वृत्त निवेदक प्रशांत सागवेकर यांनी घेतलेली मुलाखत जय महाराष्ट्र न्यूज चैनलचे संपादक प्रसाद काथे सर आयबीएन लोकमत 18 चे सहसंपादक विलास बडे सर यांची घेतलेली मुलाखत खास आकर्षण ठरलं. नवोदित पत्रकारांना या मुलाखती द्वारे संबोधित करण्यात आले. या मुलाखतीमध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या नवीन पत्रकारांनी कोणते नियम पाळावेत कशा पद्धतीचे पत्रकारिता करावी याचा मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रसाद काठे सरांनी सामाजिक भान ठेवून समाज हिताची पत्रकारिता करावी असा मोलाचा संदेश दिला. नियोजित पत्रकारांना मार्गदर्शन करत अनेक विषयावर या मुलाखतीमध्ये  चर्चा करण्यात आली या कार्यक्रमासाठी नागपूर यवतमाळ जालना बुलढाणा बीड अहमदनगर मुंबई व इतर विभागातून दैनिक युवक आधारचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व दैनिक युवा आधारच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर शैक्षणिक वकील जाहिरात दार महाराष्ट्रभरातील  प्रतिनिधी इतर माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांनी उपस्थित राहून दैनिक युवक आधारला वर्धापनदिना नि मित्त शुभेच्छा दिल्या.  सर्व उपस्थितांचे शेवटी आभार संपादक संतोष आमले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...