एक सप्टेंबर 2024 रोजी पलपब पालघर समितीने कवी जयराम कराळे लिखित 'भावतरंग' या काव्यसंग्रहाच्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले. पलपब प्रकाशनाच्या कार्यकारी अधिकारी मा. सौ. लीना पाटील मॅडम, पलपब प्रकाशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री किरण तोडकर सर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पलपब पालघर समितीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री संदीप पवार सर व इतर कार्यकारणी सदस्य यांनी भावतरंग या पुस्तकाचे ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले. पलपब पालघर समितीचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप पवार सर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला या चर्चासत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी लेखक मा. श्री गणपतराव कणसे सर प्रमुख पाहुणे कवी व लेखक मा. श्री सुहास राऊत सर कवी व लेखक मा. प्रतीक मतकर सर यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. तसेच 'भावतरंग' चे कवी जयराम कराळे सर यांची ओळख करून दिली.
मा. सुहास राऊत सर यांनी 'भावतरंग' काव्यसंग्रहाचे विषय, त्यातील विचारधारा आणि कवीचे योगदान यावर चर्चा केली. कवीने या काव्यसंग्रहामध्ये कोणते विषय हाताळले आहेत, आपल्या भावना किती उत्कटतेने आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, शेतकरी व्यथा मांडताना कवी कसा भाऊक होतो यावर आपले मत राऊत सर यांनी मांडले.
मा. प्रतीक मतकर सरांनी कवीचे लिखाणाची शैली, या काव्यसंग्रहात लिहिलेल्या गझल, ज्ञानेश्वर माऊली, विठोबा, मानवता धर्म, नामात राघवाच्या, आजार माणसांना अशा कवितांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गणपतराव कणसे सर यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ या काव्यसंग्रहाला कसे साजेसे आहे, कविता किती खोल अर्थाच्या आहेत, प्रत्येक वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत याची पावती दिली.
यानंतर अशा मान्यवरांनी आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाचे कोड कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्याबद्दल कवी जयराम कराळे सरांनी मान्यवरांबद्दल व पलपब पालघर समिती बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.
पलपब पालघर जिल्हाध्यक्ष संदीप पवार सर यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल व आयोजन समितीचे आभार मानून या कार्यक्रमाचे सांगता केले हा कार्यक्रम आपल्या सर्वांना पलपब प्रकाशनाच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल वर लवकरच पाहायला मिळेल.
Comments
Post a Comment