Skip to main content

*पलपब प्रकाशन द्वारा पुस्तक चर्चासत्र : साहित्यिक संवादाचे नवे पर्व*

 एक सप्टेंबर 2024 रोजी  पलपब पालघर समितीने  कवी जयराम कराळे लिखित  'भावतरंग'  या काव्यसंग्रहाच्या  ऑनलाइन  चर्चासत्राचे  आयोजन केले.  पलपब प्रकाशनाच्या कार्यकारी अधिकारी  मा. सौ. लीना पाटील मॅडम, पलपब  प्रकाशनचे  महाराष्ट्र अध्यक्ष  मा.श्री  किरण तोडकर सर  यांच्या  उपस्थितीत  व  मार्गदर्शनाखाली पलपब   पालघर समितीचे  जिल्हाध्यक्ष मा.श्री   संदीप पवार सर  व इतर कार्यकारणी सदस्य  यांनी  भावतरंग या पुस्तकाचे  ऑनलाइन चर्चासत्र  आयोजित केले. पलपब   पालघर समितीचे जिल्हाध्यक्ष  श्री संदीप पवार सर  यांनी  कार्यक्रमाच्या सुरुवातीला  या चर्चासत्राचे अध्यक्ष  ज्येष्ठ कवी  लेखक  मा. श्री  गणपतराव कणसे  सर  प्रमुख पाहुणे  कवी  व लेखक  मा. श्री  सुहास राऊत सर  कवी व लेखक  मा.  प्रतीक मतकर सर  यांचे  शब्दसुमनांनी स्वागत  केले.  तसेच  'भावतरंग'  चे कवी  जयराम कराळे  सर  यांची ओळख करून दिली.
  मा. सुहास राऊत सर यांनी  'भावतरंग' काव्यसंग्रहाचे  विषय,  त्यातील विचारधारा  आणि कवीचे योगदान  यावर चर्चा केली.  कवीने या काव्यसंग्रहामध्ये  कोणते विषय हाताळले आहेत,  आपल्या भावना किती उत्कटतेने  आणि प्रभावीपणे मांडण्याचा  प्रयत्न केला आहे,  शेतकरी व्यथा मांडताना  कवी कसा भाऊक होतो  यावर आपले मत राऊत सर यांनी मांडले.
 मा.  प्रतीक मतकर  सरांनी  कवीचे लिखाणाची शैली,  या काव्यसंग्रहात लिहिलेल्या गझल,  ज्ञानेश्वर माऊली,  विठोबा,  मानवता धर्म,  नामात राघवाच्या,  आजार माणसांना  अशा कवितांवर प्रकाश टाकला.
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. गणपतराव कणसे सर  यांनी  पुस्तकाचे मुखपृष्ठ  या काव्यसंग्रहाला कसे साजेसे आहे,  कविता किती खोल अर्थाच्या आहेत,  प्रत्येक वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत  याची पावती दिली.
  यानंतर  अशा मान्यवरांनी  आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाचे  कोड कौतुक केले  आणि  शुभेच्छा   दिल्याबद्दल  कवी जयराम कराळे सरांनी  मान्यवरांबद्दल  व  पलपब  पालघर समिती बद्दल  आपली कृतज्ञता व्यक्त केली.
पलपब  पालघर जिल्हाध्यक्ष  संदीप पवार सर यांनी  सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल  व  आयोजन समितीचे आभार मानून  या कार्यक्रमाचे सांगता केले  हा कार्यक्रम  आपल्या सर्वांना पलपब  प्रकाशनाच्या  ऑफिशियल  यूट्यूब चैनल वर  लवकरच पाहायला मिळेल.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...