Skip to main content

*शिक्षक दिन*


"ताई, उद्या तू आईची साडी नेसून शाळेत जाणार!"
"हो ईश, उद्या शिक्षकदिन निमित्त आम्ही दहावीची मुले शाळेत सर्व वर्गांना शिकवणार.
"शिक्षकदिन म्हणजे?"
"रात्री झोपतेवेळी मी तुला सगळे सांगते हं." असे म्हणून ताईने   रोजच्या गोष्टीच्या वेळी ईशला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णनची गोष्ट सांगायला घेतली.

"ईश, तुला माहीत आहे कां?
आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान शिक्षणतत्वज्ञ होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडूमधल्या छोट्या तिरुत्तनी गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल सर्वपल्ली विरास्वामी आणि आई  सिताम्मा होती. घरची स्थिती हलाखीचीच होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांनी पुढील शिक्षण ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल व मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून पूर्ण केले. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. आणि नंतरच्या काळात त्यांना कॉलेजचे उपकुलपती बनवण्यात आलें.  ते अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.

त्याकाळी कमी वयात लग्न केले जायचे, त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षी 1903 साली त्यांचे लग्न सिवकामूशी झाले व 108 साली त्यांना एक मुलगीही झाली.

1909 आणि 1918 साली मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज व
मैसूर युनिव्हर्सिटीत दर्शन शास्त्राचे प्रोफेसर म्हणून अनुक्रमे निवडले. तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्येही शिक्षक म्हणूनही कार्यरत झाले.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून म्हैसूर विद्यापीठाने त्यांचा गौरवही केला.
१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

डॉ. राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद आणि विर सावरकरांना  आपले आदर्श मानत असत.आपले भाषण आणि लेखनाच्या माध्यमाने त्यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीशी परिचित केले. राधाकृष्ण बहुआयामी व्यक्तिमत्व असण्यासोबताच भारतीय संस्कृतीशी प्रेम करणारेही होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या आग्रहाने ते विशिष्ट राजदुताच्या रूपात सोव्हिएत संघाच्या राजनैतिक कार्याची पूर्ती करण्यास 1947 ते 1949 पर्यंत संविधान निर्माण सभेचे सदस्य म्हणून कार्य पाहू लागले.
13 मे 1952 पासून 13 मे 1962 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. 
शिक्षण आणि राजनीतीचा क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल 1954 साली त्यांना 'भारत रत्न' हा किताब  देऊन गौरविण्यात आले.
13 मे 1962 ला त्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. 
1962 मध्ये त्यांना ब्रिटिश अकॅडमीचे सदस्यही बनवण्यात आले. 
1963 मध्ये त्यांना ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिटचा सन्मान देण्यात आला.
1968 मध्ये साहित्य अकादमी द्वारा त्यांना सभासद बनवण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् हे महान तत्वज्ञानी वक्ते व लेखक होते. त्यांनी तत्वज्ञान,धर्म मानवता, शिक्षण ह्या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या विचारांनी जगभरातील विद्वान व तत्वज्ञांवर फारच  प्रभाव पडला आहे.त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताच्या शिक्षण प्रणालीला व तत्वज्ञानाला नवी दिशा दिली. त्यांचे काही ग्रंथ खालील प्रमाणे आहेत.

द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर (1918)

इंडियन फिलोसोफी (1923) वोलूम -1

आयडलीस्टीक विव्ह  ऑफ लाईफ  (1929)

रिलीजन अँड सोसायटी (1947)

रिकव्हरी ऑफ फेथ (1956)

ए सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी (1957)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांची ही पुस्तके आपण नक्कीच वाचण्याचा प्रर्यत्न करू व त्यांचे अनुकरणही नक्कीच करू.

अशा ह्या थोर आदर्शवादी व्यक्तीमत्वाच्या महान शिक्षक ह्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1975 ला एका दीर्घ आजाराने  झाला.

त्यांचे विद्यार्थी त्यांचा जन्म दिवस साजरा करण्याचे आयोजन करत होते तेव्हा त्यांनी सांगितले की, "माझा जन्म दिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल."
आणि त्यानुसार 5 सप्टेंबर 1962 पासून त्यांच्या हयातीत शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा जडली. ह्या दिवशी शिक्षकांना सन्मानित केले जाते.
यूनेस्कोने देखील १९९४ मध्ये ५ सप्टेंबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी मान्यता दिली.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, देशकार्य आणि शेवटच्या श्वासापर्यंत निभावलेली आदर्श शिक्षकाची भूमिका, यामुळे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिन आपण साजरा करतो नि करत राहणार."
"व्वा! ताई किती महान होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन!
मी उद्या त्यांच्यावरचे छान भाषण ही करीन."
"छान, अशीच उर्जा सर्वांना मिळू दे. झोप आता."
असे बोलून भाऊ बहीण झोपी गेली.

                  ******
शोभा वागळे
मुंबई.
8850466717

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...