Skip to main content

"शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.".. भारत कवितके

.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनसुद्धा शासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.राज्यात उद्भभवणरे प्रश्न सोडविणे मुख्य मंत्री यांचे काम आहे.पण धनगर समाजाच्या उपोषणाबाबत जणू आपल्या काहीच माहिती नाही अशा पद्धतीने शासन वागत आहे.धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले की शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शासनाने धनगर समाजाच्या संविधान प्रविष्ट एसटी आरक्षण अमंलबजावणी च्या मागणी कडे गांभीर्याने पाहिले नाही.प्रसार माध्यमातून सर्वसामान्या पासून शासनापर्यंत सर्वजण पाहत आहेत.पण शासन मात्र या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.महाराष्ट्र राज्यातील अनेक लहान मोठ्या समस्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोडविल्या आहेत.मग धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता अशी सावत्रपणाची भूमिका का घेतात? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सातत्याने संघर्ष च करावा लागत आहे.सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो दोघांनी ही धनगर समाजाचे या समस्येचे घोंगडे भिजत ठेवले आहे.पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषण करणारे पैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.त्यावर दिपक बोराडे यांनी उपचारासाठी नकार दिला.दिपक बोराडे व माऊली हळवणकर या दोघांना शुगर ची समस्या आहे, उपोषण करणारे धनगर समाज बांधव यांचे जीवास काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या संतापाच्या भावना तीव्र होतील व काही तरी अघटीत घडू शकेल.त्यावेळी मात्र धनगर समाजाच्या बांधवांना कोणी रोखू शकणार नाही.शासनाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी.असे भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...