Skip to main content

"शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.".. भारत कवितके

.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनसुद्धा शासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.राज्यात उद्भभवणरे प्रश्न सोडविणे मुख्य मंत्री यांचे काम आहे.पण धनगर समाजाच्या उपोषणाबाबत जणू आपल्या काहीच माहिती नाही अशा पद्धतीने शासन वागत आहे.धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले की शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, शासनाने धनगर समाजाच्या संविधान प्रविष्ट एसटी आरक्षण अमंलबजावणी च्या मागणी कडे गांभीर्याने पाहिले नाही.प्रसार माध्यमातून सर्वसामान्या पासून शासनापर्यंत सर्वजण पाहत आहेत.पण शासन मात्र या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.महाराष्ट्र राज्यातील अनेक लहान मोठ्या समस्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सोडविल्या आहेत.मग धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता अशी सावत्रपणाची भूमिका का घेतात? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सातत्याने संघर्ष च करावा लागत आहे.सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो दोघांनी ही धनगर समाजाचे या समस्येचे घोंगडे भिजत ठेवले आहे.पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषण करणारे पैकी दिपक बोराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.त्यावर दिपक बोराडे यांनी उपचारासाठी नकार दिला.दिपक बोराडे व माऊली हळवणकर या दोघांना शुगर ची समस्या आहे, उपोषण करणारे धनगर समाज बांधव यांचे जीवास काही बरेवाईट झाले तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या संतापाच्या भावना तीव्र होतील व काही तरी अघटीत घडू शकेल.त्यावेळी मात्र धनगर समाजाच्या बांधवांना कोणी रोखू शकणार नाही.शासनाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी.असे भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...