Skip to main content

*विषय- माझे आवडते शिक्षक*



 *गुरु ब्रम्हा गुरु विष्णु* 
 *गुरूदेवो  महेश्वरा* 
 *गुरुसाक्षात परब्रम्ह* 
 *तस्मै:श्री गुरवे नमः-----* 

 माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन.
       कारण,  आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते.
" नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा"
 गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या,  प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर.
आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे  नमले. 
     सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी,  उच्च विचारसरणी चे माझे गुरु आणि माझी गुरुमाय. 
 कधीही त्यांच्या घरी गेलो की,  सारवलेलं अंगण,  रेखाटलेली रांगोळी,  आणि तुळशी वृंदावन, बाजूला पारिजातकाचं झाड, आणि फुलझाडांची छोटीशी बाग. एवढ पाहून मन कस प्रसन्न व्हायचं. वाटायचं इथं सुंदर विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे.
      घरात गेल्यावर, प्रसन्न मुद्रेने गुरूंनी मला म्हणावं, "ये घरात काय काम काढलेस? बस समोर. आणि आत बाईंना निरोप द्यायचे, "अगं, वाटीत सातूच पीठ आण" सातूचं पीठ कालवून किती गोड लागायचं !म्हणून सांगू.  
      वाटायचं काय सेवा करू यांची.? सात जन्म घेऊन घ्या गुरूंचा सेवेत रहावस  वाटतं!आपण आयुष्यात आपणास कोणीही गुरुस्थानी मानु शकतो, आई, वडील, गुरु, संत, असोत.
             आज हायस्कूल, कॉलेजात,  प्रोग्राम होतात. पार्ट्या होतात कोणी राजकीय नेता येतो. कोणी सिने अभिनेता येतो. उद्घाटनाला गावात अनेक नवनवीन कार्यक्रम होतात. त्यांचे मोठाले फोटो झळकतात  सर्व रस्त्यावर. आम्हाला संस्कार आदर भाव,  सेवा शिकवणाऱ्या माझ्या प्रेमाळ गुरूंची कोणाला आठवण येत नाही. उलट गुरुजी असे, गुरुजी तसे, म्हणून हेटाळणी केली जाते. याचे मला खूप वाईट वाटते. खरी पिढी घडवणारा तो एक शिल्पकार आहे त्या गुरूंना कायमचा दुय्यम स्थान का दिले जाते?               
       *एका ठिकाणी तर अध्यक्ष स्थानी* *अधिकारी झालेला विध्यार्थी* *स्टेजवर बसलेला आणि* त्या *कार्यक्रमाचे सूत्र संचलन* *करणारा* *त्याचे गुरु स्टेजच्या खाली ते* *बघुन मी निशब्द* *झाले.आणि विशेष म्हणजे* ही *गोष्ट  कोणाच्या लक्षातही* *आली नाही. आपल्या* *हातात हात घेवुन अक्षराला वळण* *देणारा गुरु आपण विसरून* *कसा चालेल ?* 
 *एखाद्या कार्यक्रमाच्या उदघाट्नला* *गुरुजी नसतो त्याने* *घडविलेला एखादा अधिकारी असतो.* 
        माझ्या गुरूंनी  दिलेला संस्काराचा,  आदर्शाचा वारसा आम्ही कायम चालवू. मागील वर्षी मला माझे गुरु बाजारात भेटले,  मी भर बाजारात त्यांच्या पाया पडले. त्यांनी विचारले "काय करतेस"?  मी अभिमानाने सांगितलं "गुरुजी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवले मी.  सार्थ अभिमान वाटला माझ्या गुरूंना माझा.त्यांची मी शिष्य आहे. याचा अभिमान वाटतो. मी घरातही माझ्या गुरूंचा महिमा सांगते. 
"गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,  
आम्ही चालवू हा,  पुढे वारसा!

 *शीला  पाटील. चांदवड*

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...