Skip to main content

मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द शाळेतील श्री चंद्रकांत खोसे 'आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित

 
श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर गेली 
गेली २६ वर्षे पनवेल घाटकोपर लिंक रोड हायवेला असलेल्या मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द झोपडपट्टी विभागात असलेल्या माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.ते कवी व कथालेखक 
ही आहेत त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे. त्यांना आजतागायत २१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे व 
काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी १००० प्रमाणपत्र ही प्राप्त केली आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन  दिनांक ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी 
ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्कारांच्या निवडीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते व त्यात महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांतून  १२
शिक्षकांची " आदर्श शिक्षक " पुरस्कारासाठी निवड झाली त्यात श्री 
चंद्रकांत खोसे सर यांचेही नाव झळकले व भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच (रजि ) उत्तर महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष: श्री. मा.विशाल मिसाळ,  राष्ट्रीय उपाध्यक्ष: मा.विजय जायभाये ,राष्ट्रीय कार्याध्यक्षा मा.शिल्पा मुसळे, राष्ट्रीय कोषाध्यक्षा मा.छाया देसले, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.सचिन राजपूत, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.वैशाली सूर्यवंशी, नाशिक कोषाध्यक्ष मा.कैलास पाटील आदी कार्यकारी समितीतील पदाधिकारी उपस्थित होते. 
मोहिते पाटील विद्यालय,मानखुर्द शाळेतील माध्यमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांच्या "आदर्श शिक्षक " पुरस्कार प्राप्त झाल्याचे
समजताच शाळेतील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्री. नामदेव तुकाराम शिंदे सर यांनी कौतुक केले आहे व सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...