Skip to main content

*५ सप्टेंबर "शिक्षकदिन"**औचित्य साधून**विषय:- डॉ. सर्वपल्ली* *राधाकृष्णन् व्यक्ती आणि व्यक्तिमत्व*

   ५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण भारतभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो.
   गुरुजन हे वंदनीय आहेत परब्रम्ह स्वरूप आहेत. या वंदनीय अशा गुरुजींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर ५  सप्टेंबर हा 'सर्वपल्ली राधाकृष्णन 'यांचा जन्मदिवस साजरा करतो.
   राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी  गावी झाला. नेहमी प्रथम वर्गात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
     त्यानंतर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा पत्करला. तत्त्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने देश विदेशात गाजली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास धर्मनितीशास्त्र व तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यानांसाठी सन्मानपूर्वक बोलवले होते.
     ते वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते.१९३१  ते १९३९ पर्यंत ते राष्ट्र संघात भारताचे प्रतिनिधी देखील होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. १९५२ ते १९६७ पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले.
   धर्म व तत्वज्ञान यावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे  आणि आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
   स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा 'जन्मदिन' हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.
   अनादी कालापासून आपल्या देशामध्ये शिक्षकाचे स्थान अतिउच्च मानले  आहे. शिक्षक हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य देण्यासोबतच शीलवान,नीतिमान व राष्ट्र प्रेमाने प्रेरित युवा मने विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
   ज्ञानदानाबरोबर उद्याचे संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भावी पिढीला विज्ञाननिष्ठ जगामध्ये जीवनाच्या स्पर्धेत ठामपणे उभे राहण्याचे सामर्थ्य जर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचे असेल तर तो केवळ शिक्षक हे कार्य करू शकतो.
   अशा या शिक्षकाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मिळावी म्हणून डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. प्रत्येक शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ठिकठिकाणी विविध पुरस्कारांचे आयोजन केले जाते.
   अशा या महामानवाला माझे मनापासून वंदन.

 वसुधा वैभव नाईक 
 धनकवडी जिल्हा पुणे
मो. नं. 9823582116

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...