Skip to main content

*सचिन बेंडभर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार*


ता.02 ( पुणे प्रतिनिधी)
           वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा आणि शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
          शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा यावर्षी हा बहुमान महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेली शाळा व गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीला मिळाला असून या शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्राप्त झाला.
        पुणे जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या कळो निसर्ग  मानवा या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात केली आहे. तसेच मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाचा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) द्वितीय वर्षीच्या अभ्यासक्रमात पुढील पाच वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे.
      स्वतः लिहीत असताना त्यांनी  विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता,शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके संपादित  करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत. सध्या ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित समग्र शिक्षा अंतर्गत पुस्तक निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांना पुस्तक निर्मितीसाठी मार्गदर्शन करत असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात बालसाहित्यिक घडविण्याचे त्यांचे ध्येय आहे.
      बेंडभर यांच्या या घवघवीत यशाबद्दल आंतरराष्ट्रीय शाळा मुख्याध्यापक विजय गोडसे, वाबळेवाडीचे निर्माते व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे, सणसवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर व बाळकृष्ण कळमकर, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...