Skip to main content

*गणपती बाप्पा मोरया*

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
या ओळी ऐकल्या म्हणजे आपोआप बाप्पा मोरयाची साजिरी सुंदर मूर्ती डोळ्यासमोर येते. अशावेळी मनाला होणारा आनंद हा शब्दात व्यक्त करणे कठीण. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रताच्या निमित्ताने बाप्पाच्या दर्शनाने मन प्रफुल्लित, प्रसन्न होणे म्हणजे काय असतं ते स्वतः अनुभवणे गरजेचे असते.

प्रत्येकाला आपापल्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पा मोरयाविषयी वाटणारी ओढ, जिव्हाळा अगदीं अवर्णनीय.  ६४ कला आणि १४ विद्या यांचा अधिपती असलेल्या लाडक्या बाप्पाच्या स्मरणाने भक्तांच्या मनाला एक विशेष ऊर्जा आपोआप प्राप्त होते.

शिव पार्वतीचा लाडका सुपुत्र गणपती बाप्पा लहान थोर सर्वानाच आवडतो. लाल रंगाची जास्वंद फुले, हिरव्यागार दुर्वा आणि चविष्ट असे उकडीचे मोदक असा असतो बाप्पाच्या पूजेचा थाट.

प्रत्येक नवीन कार्याच्या शुभारंभाला प्रथम पूजेचा मान श्री गणेशाला दिला जातो. शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन पुढचे सर्व काही मंगलकारक व्हावें, हा त्यामागचा हेतू असतो. श्री गणेश ही देवता बुध्दीची, सिद्धीची असल्यामुळे अभ्यासात देखील गणरायाचे साह्य मिळावे यासाठी विद्यार्थी मनोमन मोरयाची प्रार्थना करतात.

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाला असल्याने अनेक दिवसापासून गणेश चतुर्थी उत्सवाची जय्यत तयारी सुरू होते.
सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले म्हणजे गणेश चतुर्थी लवकरच येत असल्याची खात्री होते.

वर्षभराच्या कालावधीत गणरायाचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आपापल्या परीने जरी संवाद साधत असला, तरीही घरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या दर्शनाने नव्या दिवसाची होणारी सुरुवात मन प्रफुल्लित करणारी असते हे विशेष.

जगण्याचे बळ प्राप्त करून देणारा गणपती बाप्पा मनोमन प्रार्थना केली,  म्हणजे नक्की ऐकतो, समजून घेत असतो.  प्रत्येकाला मानसिक बळ आधार मिळवून देण्याचे सामर्थ्य मोरयाच्या नावात असते हे सांगायला नकोच.
गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र मंत्र उच्चाराने मनात असलेला कुविचार, दुःख दूर होण्यासाठी मदत होते. गणपती बाप्पाची कृपादृष्टी ही गोष्ट खरी म्हणजे शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा ती स्वतः अनुभवणे आवश्यक आहे.
साखरेची गोडी जशी स्वत: चाखल्या शिवाय समजत नाही, त्याचप्रमाणे गणरायाच्या दर्शनाने मिळणारा आनंद स्वतः अनुभवून पहावा लागतो. 
 
मुषकाचे वाहन छान
 डोळे इवले मोठे कान
माझ्या लाडक्या बाप्पाला
पहिल्या पूजेचा मान 

प्रत्येकाला नवीन ऊर्जा मिळवून देणारा देव म्हणजे

गणपती बाप्पा मोरया 


*सचिन पाटील*
*(अलिबाग रायगड)*

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...