Skip to main content

*लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रतिभा साहित्य संघाचा प्रथम पुरस्कार जाहिर



ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यीक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या जिमीन या कथेस अकोट तालुका, जि.अकोला या विदर्भातील ख्यातनाम प्रतिभा साहित्य संघाचे वतीने आयोजीत "उत्सव पीक पाण्याचा" यातंर्गत कथा स्पर्धेत प्रथम क्रंमाक मिळाला असल्याची माहिती प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक विशाल कुलट व सचिव सागर तळेकर यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये दिली आहे.
  या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातुन तब्बल २८७ कथा आलेल्या होत्या. यातुन गायकर यांच्या कथेस प्रथम स्थान मिळाले आहे.
  पत्रकार, लेखक व किर्तनकार म्हणुनही प्रसिद्द असलेल्या नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना कथा व कविता लेखनात या पुर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
  सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी अकोट, जि.अकोला (विदर्भ) येथील वसुंधरा माध्यामिक विदयालयात सायं.७ वा.आयोजीत करण्यात आला आहे.
  दरम्यान गायकर यांच्या या यशाचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र सह विविध साहित्यीक संस्था,पत्रकार संघ,साहित्यीक मान्यवर व अनेकविध मान्यवरानीं हार्दिक अभिनंदन केले आहे.
---------------------------------
*वाचन चळवळीसाठी असे उपक्रम उपकारक* - गायकर
----
   प्रतिभा साहित्य संघाचा उपक्रम स्तुत्य आहे.महाराष्ट्र भरात अशा विविध साहित्य संस्था, साहित्यीक वाचन, लेखन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अविश्रांत धडपड करत असतात.हया चळवळी उपकारक आहे.
  शासनाने या अशा संस्थानां अनेकविध मार्गाने प्रोत्साहित करण्याची गरज आहे.
-नवनाथ अर्जुन पा. गायकर
लेखक

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...