Skip to main content

*लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रतिभा साहित्य संघाचा प्रथम पुरस्कार जाहिर



ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यीक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या जिमीन या कथेस अकोट तालुका, जि.अकोला या विदर्भातील ख्यातनाम प्रतिभा साहित्य संघाचे वतीने आयोजीत "उत्सव पीक पाण्याचा" यातंर्गत कथा स्पर्धेत प्रथम क्रंमाक मिळाला असल्याची माहिती प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक विशाल कुलट व सचिव सागर तळेकर यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये दिली आहे.
  या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातुन तब्बल २८७ कथा आलेल्या होत्या. यातुन गायकर यांच्या कथेस प्रथम स्थान मिळाले आहे.
  पत्रकार, लेखक व किर्तनकार म्हणुनही प्रसिद्द असलेल्या नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना कथा व कविता लेखनात या पुर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
  सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी अकोट, जि.अकोला (विदर्भ) येथील वसुंधरा माध्यामिक विदयालयात सायं.७ वा.आयोजीत करण्यात आला आहे.
  दरम्यान गायकर यांच्या या यशाचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र सह विविध साहित्यीक संस्था,पत्रकार संघ,साहित्यीक मान्यवर व अनेकविध मान्यवरानीं हार्दिक अभिनंदन केले आहे.
---------------------------------
*वाचन चळवळीसाठी असे उपक्रम उपकारक* - गायकर
----
   प्रतिभा साहित्य संघाचा उपक्रम स्तुत्य आहे.महाराष्ट्र भरात अशा विविध साहित्य संस्था, साहित्यीक वाचन, लेखन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अविश्रांत धडपड करत असतात.हया चळवळी उपकारक आहे.
  शासनाने या अशा संस्थानां अनेकविध मार्गाने प्रोत्साहित करण्याची गरज आहे.
-नवनाथ अर्जुन पा. गायकर
लेखक

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...