Skip to main content

एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाची आक्रमकता वाढत आहे...... पत्रकार भारत कवितके.

भारत कवितके मुंबई कांदिवली 
 सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाचे 6 मल्हार यौध्दे (समाज बांधव) आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यानंतर लातूर, नेवासा या ठिकाणी ही धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत.धनगर समाजाची एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरकार जरी सकारात्मक असेल तरी कायद्याच्या चौकटीत टिकणारे एसटी आरक्षण अमंलबजावणी करण्याची तयारी दाखवली आहे.त्या करिता कमिटी स्थापन करुन लवकरच निर्णय घेतला जाईल.असे कळविले आहे.पण आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांनी हातात एसटी आरक्षण अमंलबजावणी प्रमाणपत्र पडल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.असा निर्णय घेतला आहे.आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण, तहसीलदार यांना निवेदन देणे, उपोषण स्थळी विष प्राशन करून करणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे, समाजातील महिला विश्रांती ताई भुषनर यांनी उपोषण स्थळा पासून थोड्या अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले सिनेमा स्टाईल आंदोलन केले,व आंदोलनास पाठिंबा दिला, आमदार खासदार यांच्या कडून पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत त्यांच्या घरी जाऊन ढोल किंवा इतर वाद्य वाजवून त्यांचा व्हिडिओ काढणे, पाण्यामध्ये जलसमाधी चा सरकारला इशारा देणे,व सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील गावा गावात, तालुका, जिल्हा या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, सरकारने जर लवकरात लवकर एसटी आरक्षण अमंलबजावणी केली नाही तर धनगर समाज आपल्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवेल,असा इशारा पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात उपोषण स्थळी प्रा.यशपाल भिंगे सरांनी दिला आहे.सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, आमदार गोपीचंद पडळकर,व उपोषण कर्त्यानी रास्ता रोको आंदोलन करुन सरकारवर दबाव वाढवावा.असे आवाहन राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...