Skip to main content

एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाची आक्रमकता वाढत आहे...... पत्रकार भारत कवितके.

भारत कवितके मुंबई कांदिवली 
 सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाचे 6 मल्हार यौध्दे (समाज बांधव) आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यानंतर लातूर, नेवासा या ठिकाणी ही धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत.धनगर समाजाची एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरकार जरी सकारात्मक असेल तरी कायद्याच्या चौकटीत टिकणारे एसटी आरक्षण अमंलबजावणी करण्याची तयारी दाखवली आहे.त्या करिता कमिटी स्थापन करुन लवकरच निर्णय घेतला जाईल.असे कळविले आहे.पण आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांनी हातात एसटी आरक्षण अमंलबजावणी प्रमाणपत्र पडल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.असा निर्णय घेतला आहे.आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण, तहसीलदार यांना निवेदन देणे, उपोषण स्थळी विष प्राशन करून करणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे, समाजातील महिला विश्रांती ताई भुषनर यांनी उपोषण स्थळा पासून थोड्या अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले सिनेमा स्टाईल आंदोलन केले,व आंदोलनास पाठिंबा दिला, आमदार खासदार यांच्या कडून पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत त्यांच्या घरी जाऊन ढोल किंवा इतर वाद्य वाजवून त्यांचा व्हिडिओ काढणे, पाण्यामध्ये जलसमाधी चा सरकारला इशारा देणे,व सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील गावा गावात, तालुका, जिल्हा या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, सरकारने जर लवकरात लवकर एसटी आरक्षण अमंलबजावणी केली नाही तर धनगर समाज आपल्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवेल,असा इशारा पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात उपोषण स्थळी प्रा.यशपाल भिंगे सरांनी दिला आहे.सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, आमदार गोपीचंद पडळकर,व उपोषण कर्त्यानी रास्ता रोको आंदोलन करुन सरकारवर दबाव वाढवावा.असे आवाहन राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...