Skip to main content

साहित्यिक भारत कवितके यांनी पंढरपूर येथील उपोषण कर्त्या धनगर बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सोमवार दिनांक 9 सप्टेंबर २०२४ पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात उपोषणाला बसलेल्या पाच मल्हार यौध्दे ची मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.संविधाना मध्ये समाविष्ट असून सुद्धा धनगर समाजाच्या दोन तीन पिढ्या एसटी आरक्षणाच्या सवलती पासून वंचित आहेत.धनगर समाजाला जवळ जवळ सर्वच पक्षांनी फसविले आहे.आदमपूर येथील ओवीकारांनी प्रथम पारंपारिक पद्धतीने ओवी तून एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता पांडुरंगाकडे साकडे घातले.वाजत गाजत सर्व जमलेल्या धनगर समाज बांधवांनी नामदेव पायरी जवळ जाऊन पांडुरंगाच्या चरणी निवेदन दिले.समाजातील अनेक मान्यवरांन
व्यासपीठावरून आपली मनोगते व्यक्त केली.प्रा.यशपाल भिंगे सर म्हणाले," या आंदोलनाला राजकीय वास नाही, राजकीय घुसखोरी या ठिकाणी होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी.समाजातील कार्यकर्ते यांनी राजकीय नेतृत्व निर्माण करावे." शेवटी पांडुरंग मेरगळ यांनी दिपक बोराडे, माऊली हळवणकर, विजय तमनर, गणेश केसरकर, योगेश धरम,या पाच उपोषण कर्त्याची नावे जाहीर करून उपोषणाला सुरुवात केली.मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण कर्त्याची चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.सदर उपोषण आंदोलन सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने होत आहे.पांडुरंग मेरगळ, विजय गोफणे, बिरु कोळेकर,व इतर कार्यकर्ते या गेले दोन तीन महिने परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...