शिक्षक हे असे मार्गदर्शक...
जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले...
तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.
आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.
पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.
काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!
मी आणिक माझे मित्रमैत्रिणी.आमचा ग्रुपच वेगळा होता.विचारांनी देखील.आम्ही मज्जा,मस्ती करायचो.रुसवे,फुगवे असायचे.तितकेच अभ्यासही करायचो.शिक्षकांना केव्हा प्रेमळ तर केव्हा मस्तीखोर वाटायचो.शिक्षक आणि आमचं नातं मैत्रीपूर्ण खरेपणाचे असायचे.
मनी एक,दाखवायचे एक असे कधी वागणे जमलेच नाही. कोणालाही घाबरणे नाही, तेवढाच स्पष्टवक्ते ठासून भरलेला,आत्मविश्वासू व्रुत्ती,खरेपणाचीच साथ,प्रामाणिकपणा स्वतःशीही आणि शिक्षकांशीही,बिनधास्त राहणीमान, प्रत्येक उपक्रमात उत्साह असायचा,असे आमचे वागणे होते.आपण खरे आहोत तर इतरांना का घाबरायचे अशी विचारधरणी ठेवून मदतीच्या बाबतीत जमेल तशी मदत करत राहायचे.असे आमचे वेगळेच आयुष्य जगतं होतो.कोणत्याही प्रकारे मन दुःखी झाले.तरी देखील स्वतंत्र जगायची वागायची,ठरवायची,वेगळीच ऊर्जा होती अंगी.
शाळा, महाविद्यालये असे जीवनटप्पे होते.जिथे पैसे मिळत नव्हते.मात्र स्वतंत्रता होती.आमच्या कलागुणांचे व्यासपीठ होते.त्या मोबदल्यात शाबासकीची थाप मिळत होती.त्याहून किमती पैश्यापेक्षा मौल्यवान मिळत होते ते मानसिक समाधान,सुखद भावना.
तिथे नव्हती कोणतीच
जात,धर्म,भेदभाव.
तिथे होते ते फक्त
वास्तविक ज्ञान देताना,
जगात असलेली माणसे
कशी वागतात,बोलतात.
आपले वय वाढत जाताना,
आपल्यासोबत बदलणारे
त्यांचे वागणे,हे कळवळून
सांगणारे प्रत्येक शिक्षक.
- कु.श्रद्धा सावंत.
विरार(सिंधुदुर्ग-मालवण)
Comments
Post a Comment