Skip to main content

मुंबई आझाद मैदानात सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे यांचे आमरण उपोषण

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम 

सकल धनगर जमात, महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई आझाद मैदानात धनगर समाजाच्या सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या महिला कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 5 आक्टोंबर 2024 पासून धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.काम जुनेच पण नव्या दमाने करायचे,ना नेता ना पक्ष एसटी आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष या सकल धनगर जमातीच्या उद्देशाने प्रेरित होऊन सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
यांनी सर्व समाजातील पुरुष व महिला यांना आवाहन केले आहे की," मी आपल्या समाजासाठी मरायला तयार झाले आहे, समाज बंधु भगिनींनो तुम्ही एकत्र या" धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता वरचेवर आक्रमक होत आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने चालू आहेत.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 15 दिवसांची दिलेली मुदत संपून गेली, डॉ.सुधाकर शिंदे यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.त्यात आदीवासी समाजाचे आमदार खासदार धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करु नये म्हणून आक्रमक झाले आहेत.मंत्रालयाच्या संरक्षण जाळीत उड्या मारीत आंदोलन केले.संभाजीनगर मध्ये आदीवासी विकास विभागातून एक दोन दिवसात खिलारे कुटुंबातील पाच जणांचे धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.सर्व ठिकाणी एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आशावाद निर्माण झाला असतानाच आदीवासी समाजातील आमदार खासदार यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीत उड्या मारीत आंदोलन केले.आता मात्र धनगर समाजाची आंदोलनाची तीव्रता वाढली असून सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या धनगर समाजाच्या रणरागिणी आमरण उपोषणाला बसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...