Skip to main content

मुंबई आझाद मैदानात सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे यांचे आमरण उपोषण

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम 

सकल धनगर जमात, महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई आझाद मैदानात धनगर समाजाच्या सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या महिला कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 5 आक्टोंबर 2024 पासून धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत.काम जुनेच पण नव्या दमाने करायचे,ना नेता ना पक्ष एसटी आरक्षण अमंलबजावणी हेच लक्ष या सकल धनगर जमातीच्या उद्देशाने प्रेरित होऊन सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
यांनी सर्व समाजातील पुरुष व महिला यांना आवाहन केले आहे की," मी आपल्या समाजासाठी मरायला तयार झाले आहे, समाज बंधु भगिनींनो तुम्ही एकत्र या" धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता वरचेवर आक्रमक होत आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने चालू आहेत.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 15 दिवसांची दिलेली मुदत संपून गेली, डॉ.सुधाकर शिंदे यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही.त्यात आदीवासी समाजाचे आमदार खासदार धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी करु नये म्हणून आक्रमक झाले आहेत.मंत्रालयाच्या संरक्षण जाळीत उड्या मारीत आंदोलन केले.संभाजीनगर मध्ये आदीवासी विकास विभागातून एक दोन दिवसात खिलारे कुटुंबातील पाच जणांचे धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.सर्व ठिकाणी एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आशावाद निर्माण झाला असतानाच आदीवासी समाजातील आमदार खासदार यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीत उड्या मारीत आंदोलन केले.आता मात्र धनगर समाजाची आंदोलनाची तीव्रता वाढली असून सौ.जयश्रीताई श्रावण वाक्षे या धनगर समाजाच्या रणरागिणी आमरण उपोषणाला बसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...