Skip to main content

..... अखेर खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले

.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले, आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमंलबजावणी साठी मार्ग मोकळा झाला.आता एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता मंत्रालयातून थेट जीआर (परिपत्रक) काढण्यास काही ही अडचण राहिलेली नाही.सकल धनगर जमातीच्या वतीने पुणे येथे अधिवेशन, जेजुरी ते पंढरपूर जागर यात्रा,९ सप्टेंबर २०२४ पासून पंढरपूर येथे आपले सहा उपोषण करणारे मल्हार यौध्दे,१६ दिवसाचे उपोषण संपून छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालया बाहेर गणेश केसकर व योगेश धरम यांनी उपोषण करुन खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.या दरम्यान महाराष्ट्र विविध ठिकाणी उपोषण, लाक्षणिक उपोषण, रास्ता रोको, निवेदने देणे,टायर जाळून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्या बरोबर घेऊन आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन धनगर समाज बांधवांनी व भगिनी केली.या सर्वांच्या परिश्रमाने छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून सहा खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले.यामुळे धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची ५० टक्के लढाई जिंकला असून मंत्रालयातून आता धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता थेट जीआर काढावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाज बांधव आता लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.व आपल्या वर ७० वर्ष झालेला अन्याय दूर करणार, डॉ.सुधाकर शिंदे समितीचा अहवाल ही मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.या सर्व पाश्र्वभूमीवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी चा जीआर काढतील अशी प्रत्येक धनगर समाज बांधवांच्या मनात आशा आहे.आचारसंहिता लागण्यापूर्वीच आरक्षण अमंलबजावणी होईल, हे मात्र नक्की.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मोबाईल 8652305700

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...