भारताचे भाग्यवान
अद्वितीय व्यक्तिमत्त्व
मोती तेजस्वी निर्मळ
समजून घ्यावे सत्त्व..
बुद्धिवंत, कीर्तीवंत
हरपला प्रिय तारा
माणुसकी पुजाऱ्यास
भेटण्यास जमा दारा...
तारा हा खूप तेजस्वी असतो,तो जळतो अन् सर्वांना प्रकाश,उष्णता ऊर्जा प्रदान करतो.तसेच तुम्ही होता आमच्या सर्वांसाठी.तुमच्या कार्याने कोणीही अचंबित होईल असे तुमचे अद्वितीय तुमचे कार्य आहे.त्याची सर कशालाच येणार नाही.तुम्ही निरपेक्ष पणे सर्वांना मदतच करत गेला.स्वार्थ तुमच्या मनालाही शिवला नाही.तुम्ही ध्येयाने प्रेरित होता,अन् त्यासाठी अतोनात कष्ट घेतले.अथक परिश्रम केले.हार कधी मानली नाही.अपयश जरी सुरुवातीला आले तरी खचून कधी गेले नाहीत.तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले.स्वप्न पहायला शिकविले.अन्,ते पूर्ण करण्यास सतत प्रयत्न ही करायला शिकवले.महत्त्वाचे तुम्ही माणूस म्हणून जगलात.कोणतीही श्रीमंतीची हवा तुम्हाला लागली नाही.सर्वांचे नेहमी पोट भरत राहिलात.
स्वर्गीय रतनजी टाटा,तुमच्यासारखा नेक,चमकता,माणुसकीचा पुजारी, परिश्रमी,ध्येयवान,तेजस्वी हिरा, भारताला पुन्हा लाभणे शक्य नाही.तुमचे विचार,आचार यांची खोली खूप खोलवर होती.आपल्या भारताची आन,बान,शान तुम्ही होतात.तुम्ही होतात तो पर्यंत संपूर्ण भारताचे बाप झालात...तुमच्याविना आम्ही पोरके झालोत.तुम्ही होतात तोपर्यंत हिंमत,विश्वास होता,आपल्या पाठीशी भक्कम हात आहेत.ते आपला हात धरतील,चालायला शिकवतील.जगण्याचे बळ देत होता तुम्ही.तुमच्यात प्रचंड ऊर्जा होती.प्रत्येकाची काळजी होती.बापासारखे भक्कम पण,कोमल मन तुमच्याजवळ होते.
येथील प्रत्येकाला फक्त कमावण्याची हाव लागली आहे... देण्याचा दानशूरपणा कोणात पहायला ही भेटत नाही.तुमच्या इतके दानशूर आम्ही कधी पाहिलेले नाही.एकविसाव्या शतकातील तुम्ही आमची प्रेरणा होती,तुम्ही आमची छाया होती..तुम्ही कायम आमच्यावर माया केली,आमच्यावर प्रेम केले,तुमची प्रतिमा आम्ही आमच्या हृदयात कोरली.स्वच्छ,निर्मळ,प्रेमळ,प्रांजळ अशी तुमची प्रतिमा...बोलके चक्षु......तुमच्यामुळे भारताची मान उंचावली होती. माणसातला देव प्रत्यक्ष आम्हाला भेटला होता...पण,जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला...तुमचा आशिष नित्य आमच्या पाठीशी आहे.तुम्ही तुमच्या कार्याने नित्यच आमच्या हृदयात असणार...तुम्ही आहात तेथून ही आम्हाला आशीर्वाद द्याल..याची खात्री आहे.माणसे कमावली होती तुम्ही... माणूस बनून वावरलात.... तुमचे पाय कायम भारत मातेच्या मातीतच होते...भारताच्या कल्याणासाठी तुम्हाला जे जे करणे शक्य होते ते ते तुम्ही करत होता....याचा आम्हाला सार्थ अभिमान होता.तुमच्या सारख्या व्यक्ती भारताला लाभले गौरवास्पद गोष्ट आहे....... तुमच्यातील १०% गुण घेवून जरी माणसांनी वाटचाल केली तरी विषमता दरी मिटेल...सारे विचाराने प्रगल्भ होणे गरजेचे आहे...खूप काही बोलावे वाटते,लिहावे वाटते.....व्यक्त व्हावे वाटते...
नयनी अलगद आसू जमा होतात.काय गमावले आम्ही याची जाणीव होती. टाटा समूहाच्या नावातच दम होता.तो माणुसकीने तुम्ही नित्य टिकवला.जेथे तुमची गरज पडली तेथे तुम्ही कायम उभे राहिलात.तूमच्याविना आम्ही आता पोरके झालोत.तुमच्यातील प्रेम,जिव्हाळा,अखंड वहावा...असे कोणी तरी पुन्हा जन्मावे.साधी राहणी,स्वावलंबी जीवन,उच्च विचारसरणी,समानता,कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.प्राण्यांवर ही तितकेच प्रेम होते त्यांचे.जो प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करू शकतो, तो किती पवित्र,निर्मळ,प्रेमळ,हास्याचा झरा असेल.हा प्रेमाचा ठेवा आता काळाच्या पडद्याआड गेला.
त्यांच्याप्रमाणे आपण घडू,त्यांच्यातील दानशूरपणा आपल्यात येईल,सतत कार्यमग्न असणे,स्वतः पेक्षा देशाचा विचार करणे,समानता,मानवता नांदेल तेव्हा खऱ्या अर्थाने रतनजी सरांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
Comments
Post a Comment