Skip to main content

स्वर्गीय रतनजी टाटा एक अद्वितीय व्यक्तिमत्व.


भारताचे भाग्यवान
अद्वितीय व्यक्तिमत्त्व
मोती तेजस्वी निर्मळ
समजून घ्यावे सत्त्व..

बुद्धिवंत, कीर्तीवंत 
हरपला प्रिय तारा 
माणुसकी पुजाऱ्यास
भेटण्यास जमा दारा... 

      तारा हा खूप तेजस्वी असतो,तो जळतो अन् सर्वांना प्रकाश,उष्णता ऊर्जा प्रदान करतो.तसेच तुम्ही होता आमच्या सर्वांसाठी.तुमच्या कार्याने कोणीही अचंबित होईल असे तुमचे अद्वितीय तुमचे कार्य आहे.त्याची सर कशालाच येणार नाही.तुम्ही निरपेक्ष पणे सर्वांना मदतच करत गेला.स्वार्थ तुमच्या मनालाही शिवला नाही.तुम्ही ध्येयाने प्रेरित होता,अन् त्यासाठी अतोनात कष्ट घेतले.अथक परिश्रम केले.हार कधी मानली नाही.अपयश जरी सुरुवातीला आले तरी खचून कधी गेले नाहीत.तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले.स्वप्न पहायला शिकविले.अन्,ते पूर्ण करण्यास सतत प्रयत्न ही करायला शिकवले.महत्त्वाचे तुम्ही माणूस म्हणून जगलात.कोणतीही श्रीमंतीची हवा तुम्हाला लागली नाही.सर्वांचे नेहमी पोट भरत राहिलात.
       स्वर्गीय रतनजी टाटा,तुमच्यासारखा नेक,चमकता,माणुसकीचा पुजारी, परिश्रमी,ध्येयवान,तेजस्वी हिरा, भारताला पुन्हा लाभणे शक्य नाही.तुमचे विचार,आचार यांची खोली खूप खोलवर होती.आपल्या भारताची आन,बान,शान तुम्ही होतात.तुम्ही होतात तो पर्यंत संपूर्ण भारताचे बाप झालात...तुमच्याविना आम्ही पोरके झालोत.तुम्ही होतात तोपर्यंत हिंमत,विश्वास होता,आपल्या पाठीशी भक्कम हात आहेत.ते आपला हात धरतील,चालायला शिकवतील.जगण्याचे बळ देत होता तुम्ही.तुमच्यात प्रचंड ऊर्जा होती.प्रत्येकाची काळजी होती.बापासारखे भक्कम पण,कोमल मन तुमच्याजवळ होते.
         येथील प्रत्येकाला फक्त कमावण्याची हाव लागली आहे... देण्याचा दानशूरपणा कोणात पहायला ही भेटत नाही.तुमच्या इतके दानशूर आम्ही कधी पाहिलेले नाही.एकविसाव्या शतकातील तुम्ही आमची प्रेरणा होती,तुम्ही आमची छाया होती..तुम्ही कायम आमच्यावर माया केली,आमच्यावर प्रेम केले,तुमची प्रतिमा आम्ही आमच्या हृदयात कोरली.स्वच्छ,निर्मळ,प्रेमळ,प्रांजळ अशी तुमची प्रतिमा...बोलके चक्षु......तुमच्यामुळे भारताची मान उंचावली होती. माणसातला देव प्रत्यक्ष आम्हाला भेटला होता...पण,जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला...तुमचा आशिष नित्य आमच्या पाठीशी आहे.तुम्ही तुमच्या कार्याने नित्यच आमच्या हृदयात असणार...तुम्ही आहात तेथून ही आम्हाला आशीर्वाद द्याल..याची खात्री आहे.माणसे कमावली होती तुम्ही... माणूस बनून वावरलात.... तुमचे पाय कायम भारत मातेच्या मातीतच होते...भारताच्या कल्याणासाठी तुम्हाला जे जे करणे शक्य होते ते ते तुम्ही करत होता....याचा आम्हाला सार्थ अभिमान होता.तुमच्या सारख्या व्यक्ती भारताला लाभले गौरवास्पद गोष्ट आहे....... तुमच्यातील १०% गुण घेवून जरी माणसांनी वाटचाल केली तरी विषमता दरी मिटेल...सारे विचाराने प्रगल्भ होणे गरजेचे आहे...खूप काही बोलावे वाटते,लिहावे वाटते.....व्यक्त व्हावे वाटते...
         नयनी अलगद आसू जमा होतात.काय गमावले आम्ही याची जाणीव होती. टाटा समूहाच्या नावातच दम होता.तो माणुसकीने तुम्ही नित्य टिकवला.जेथे तुमची गरज पडली तेथे तुम्ही कायम उभे राहिलात.तूमच्याविना आम्ही आता पोरके झालोत.तुमच्यातील प्रेम,जिव्हाळा,अखंड वहावा...असे कोणी तरी पुन्हा जन्मावे.साधी राहणी,स्वावलंबी जीवन,उच्च विचारसरणी,समानता,कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.प्राण्यांवर ही तितकेच प्रेम होते त्यांचे.जो प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करू शकतो, तो किती पवित्र,निर्मळ,प्रेमळ,हास्याचा झरा असेल.हा प्रेमाचा ठेवा आता काळाच्या पडद्याआड गेला.
            त्यांच्याप्रमाणे आपण घडू,त्यांच्यातील दानशूरपणा आपल्यात येईल,सतत कार्यमग्न असणे,स्वतः पेक्षा देशाचा विचार करणे,समानता,मानवता नांदेल तेव्हा खऱ्या अर्थाने रतनजी सरांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...