Skip to main content

कांदिवली येथे चारकोप विधानसभा भाजपा उमेदवार योगेश सागर यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधी उमेदवारांना भरली धडकी


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
१६१, चारकोप विधानसभा मधील भाजपाचे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांना प्रचार फेरी दरम्यान वाढती लोकप्रियता मिळत असल्याचे पाहून विरोधकांना धडकी भरली.कांदिवली चारकोप चौथ्या वेळी विधानसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजप योगेश सागर यांनी या विभागात पाणी,रस्ते, लाईट, शौचालय,दवाखाने,खेळाची मैदाने, नवीन शाळा,कालेज, महिलांना शिलाई मशीनचे , मेंदी क्लास, ब्युटी पार्लर ट्रेनिंग, श्रवण यंत्र,मुला मुलींना महागाडे शाळा कॉलेज प्रवेश देणे,गरिब मुला मुलींना उच्च शिक्षण देणे,विज दर वाढीच्या विरोधात मोर्चा काढणे,गरिब मुलीचे सामुहिक विवाहाचे आयोजन, संसार उपयोगी वस्तू देणे, आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम चे आयोजन,गरिब,मुला मुलींना शिक्षणासाठी संगणक मुफ्त देणे, रुग्णांना लहान मोठ्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत करणे, विभागातील झोपडपट्टी एस,आर, योजनेत रहिवासीच्या बाजूने उभे राहणे, विकासकाकडून इमारत चांगल्या सुस्थितीत तयार करून घेणै,रुम च्या चावी वाटप करणे,पोयसर नदीतील पाण्यातील गाळ काढणे, वगैरे वगैरे प्रकारची कामे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांनी करून चारकोप कांदिवली विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.प्रचार फेरी दरम्यान ठिक ठिकाणी महिला व पुरुष गर्दी करीत होते.योगेश सागर यांना फुलांचा हार घालून शुभेच्छा देत होते.तर महिला पंचारती ने ओवाळताना दिसत होत्या." जय जय जय शिवाजी जय जय जय भवानी" योगेश सागर आगे बढो,हम तुमारे साथ है' " भारतीय जनता पक्षाचा विजय असो" अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.योगेश सागर घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत होते, समस्या जाणून घेत होते.येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५वाजेपर्यत मतदान करण्यासाठी जाऊन कमळ या निशाणी वर मोहर लाऊन जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करा " असे योगेश सागर मतदारांना आवाहन करीत होते.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...