Skip to main content

शब्द माझे तुझ्याचसाठी " आणि "मयूरस्पर्श " प्रकाशित

 
    उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या  साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे  कवयित्री अश्विनी सचिन बोलके यांचा 'शब्द माझे तुझ्याचसाठी' हा काव्यसंग्रह तसेच कवी मयूर महादेव पालकर यांचा 'मयूरस्पर्श' हा चारोळीसंग्रह नवीन पनवेल येथील अभियंता भवन, आकुर्ली येथे प्रकाशित झाला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री,शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असं असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते. 
सदर मान्यवरांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे अनावरण केले गेले. कवयित्री अश्विनी बोलके आणि मयूर पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुगटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सक्रिय कार्यकर्ते संजय पालकर यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या तर  पल्लवी काळे यांनी 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकातील 'ऋणानुबंध' ही कविता सादर केली. कवयित्री हिरकणी गीतांजली वाणी यांनी 'मयूरस्पर्श' चारोळीसंग्रहास शुभेच्छा दिल्या तर कवयित्री प्रियंका कोठावदे आणि कवयित्री रजनी येवले यांनी 'मयूरस्पर्श' चारोळीसंग्रहातील काही निवडक चारोळ्या सादर केल्या.  दुर्गेश सोनार यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकाबद्दल,"या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात,इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत." असे बोल व्यक्त केले. "मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श", अशा शब्दांत कवयित्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूर पालकर यांच्या 'मयूरस्पर्श ' विषयी आपले मनोगत व्यक्त केले.जेष्ठ  साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गझलकार सन्माननीय ए. के . शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे प्रकाशन झाले असे जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर ह्यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.सचिन बोलके ह्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...