Skip to main content

समाज परिवर्तन करण्यासाठी ज्या सदैव आपल्या विचारातून कर्मातून प्रयत्न करत असतात अशा मार्गदर्शिका , लेखिका आम्रपाली धेंडे मॅडम यांचे नाटक कलांतर ......एक हृदयस्पर्शी कथा ...दिग्दर्शक चिन्मय मायदेव


दिनांक : 9/11/20224 रोजी डोंबिवली पूर्व या ठिकाणी कलांतर.... एक हृदयस्पर्शी कथा हे नाटक संपन्न करण्यात आले लेखिका आम्रपाली धेंडे यांनी या नाटकातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाटक प्रत्येकाने पाहून कुटुंबा चा  दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला आहे . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे मत लेखिका आम्रपाली धेंडे यांनी व्यक्त केले आहे. मुलांना समजून घेऊन त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना प्रेम दिले पाहिजे . या नाटकाचे सुंदर असे दिग्दर्शन चिन्मय मायदेव सरांनी केले आहे . चिन्मय सर यांच्यात ही एक छान कला आहे सर्वांना एकत्रित घेऊन छान असे दिग्दर्शन करतात त्यामुळे अभिनय हा छान प्रकारे पार पडला जातो तसेच तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे  रश्मी वर्मा  ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल )
 मनाने पाटील .. समाजसेविका 
 प्राजक्ता बर्वे   :: नृत्य विशारद 
 स्मिता माटेकर .. Model या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून समजा मध्ये छान परिवर्तन घडून येईल आणि हे नाटक प्रत्येकाने पहावे असे आपले मत व्यक्त केले आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील सांगण्यात आले . नाटकातील सुंदर विचार दृष्टिकोन पाहून प्रमुख पाहुणे यांनी खूप कौतुक करून समाजामध्ये बदल निर्माण आपण करूया असे आश्वासन दिले 
             अभिनय सर्वांनी खूप छान प्रकारे सादर करून सर्वच कलाकारांनी साथ देऊन समाजामध्ये सुंदर विचार मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे . प्रत्येकाने खूप प्रयत्न करून हे नाटक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाने कामातून वेळ काढून सुंदर असे नाटक सादर केले आहे त्यामुळे सर्व कलाकारांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याचप्रमाणे सूत्रसंचालन उत्तमरीत्या स्नेहा केसरकर यांनी पार पाडले या सूत्रसंचालनातून त्यांनी अनेकांची मने जिंकले 
          माधुरी पुजारी, दीपक खेमकर ,स्मिता भीमनवार ,नक्षत्र वराळे ,आरती यादव ,सुप्रिया कुंभार ,रसिका कुलकर्णी ,प्रमिला शिरसाठ ,मनीषा खेमकर, गुंजन पाठारे ,स्वराज पाटील ,चित्रा खरे, प्रतिभा काळे ,वृषाली देशपांडे ,मीनाक्षी जोशी या सर्वांनी अप्रतिम असे नाटकातून समाजकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे या नाटकाचे कौतुक होऊन सर्वांचे अभिनंदन होत आहे या नाटकासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेते सौरभ गोखले ,अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेत्री अनघा देव, सुप्रसिद्ध तबला वादक वरद कठापुरकर, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेत्री स्वाती करणेकर, अभिनेत्री वैशाली गवळी, अभिनेते अविनाश नारकर या सर्वांच्या भरभरून शुभेच्छा आल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...