समाज परिवर्तन करण्यासाठी ज्या सदैव आपल्या विचारातून कर्मातून प्रयत्न करत असतात अशा मार्गदर्शिका , लेखिका आम्रपाली धेंडे मॅडम यांचे नाटक कलांतर ......एक हृदयस्पर्शी कथा ...दिग्दर्शक चिन्मय मायदेव
दिनांक : 9/11/20224 रोजी डोंबिवली पूर्व या ठिकाणी कलांतर.... एक हृदयस्पर्शी कथा हे नाटक संपन्न करण्यात आले लेखिका आम्रपाली धेंडे यांनी या नाटकातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाटक प्रत्येकाने पाहून कुटुंबा चा दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला आहे . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे मत लेखिका आम्रपाली धेंडे यांनी व्यक्त केले आहे. मुलांना समजून घेऊन त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना प्रेम दिले पाहिजे . या नाटकाचे सुंदर असे दिग्दर्शन चिन्मय मायदेव सरांनी केले आहे . चिन्मय सर यांच्यात ही एक छान कला आहे सर्वांना एकत्रित घेऊन छान असे दिग्दर्शन करतात त्यामुळे अभिनय हा छान प्रकारे पार पडला जातो तसेच तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे रश्मी वर्मा ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल )
मनाने पाटील .. समाजसेविका
प्राजक्ता बर्वे :: नृत्य विशारद
स्मिता माटेकर .. Model या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून समजा मध्ये छान परिवर्तन घडून येईल आणि हे नाटक प्रत्येकाने पहावे असे आपले मत व्यक्त केले आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील सांगण्यात आले . नाटकातील सुंदर विचार दृष्टिकोन पाहून प्रमुख पाहुणे यांनी खूप कौतुक करून समाजामध्ये बदल निर्माण आपण करूया असे आश्वासन दिले
अभिनय सर्वांनी खूप छान प्रकारे सादर करून सर्वच कलाकारांनी साथ देऊन समाजामध्ये सुंदर विचार मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे . प्रत्येकाने खूप प्रयत्न करून हे नाटक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाने कामातून वेळ काढून सुंदर असे नाटक सादर केले आहे त्यामुळे सर्व कलाकारांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याचप्रमाणे सूत्रसंचालन उत्तमरीत्या स्नेहा केसरकर यांनी पार पाडले या सूत्रसंचालनातून त्यांनी अनेकांची मने जिंकले
माधुरी पुजारी, दीपक खेमकर ,स्मिता भीमनवार ,नक्षत्र वराळे ,आरती यादव ,सुप्रिया कुंभार ,रसिका कुलकर्णी ,प्रमिला शिरसाठ ,मनीषा खेमकर, गुंजन पाठारे ,स्वराज पाटील ,चित्रा खरे, प्रतिभा काळे ,वृषाली देशपांडे ,मीनाक्षी जोशी या सर्वांनी अप्रतिम असे नाटकातून समाजकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे या नाटकाचे कौतुक होऊन सर्वांचे अभिनंदन होत आहे या नाटकासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेते सौरभ गोखले ,अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेत्री अनघा देव, सुप्रसिद्ध तबला वादक वरद कठापुरकर, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेत्री स्वाती करणेकर, अभिनेत्री वैशाली गवळी, अभिनेते अविनाश नारकर या सर्वांच्या भरभरून शुभेच्छा आल्या आहेत
Comments
Post a Comment