Skip to main content

स्वारगेट (पुणे) बस स्थानकातील गैरसोयी मुळे प्रवाशी त्रस्त तर महाराष्ट्र परिवहन महामंडळ मात्र मस्त.


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती समजले जाणारे बस स्थानक स्वारगेट (पुणे) बस स्थानक परिसरात गैरसोयी मुळे प्रवाशी वर्ग त्रस्त झालेला असून तेथील महामंडळ प्रशासन मात्र मस्त असल्याचे दिसून येते,या बस स्थानकात मोटार सायकल,चार चाकी वाहने, रिक्षा,बस स्थानक च्या डाव्या व उजव्या बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात, साहजिकच बाहेरुन येणाऱ्या बसेसची कोंडी होते,बस स्थानक च्या प्रवेशद्वारा जवळ आत पर्यंत रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात.येथून आत येणाऱ्या बसेसना अडथळा निर्माण होतो व स्थानका बाहेर बसची रांग लागली जाते व वाहतूक कोंडी होते.प्रवाशांना पायी चालत बस स्थानकात प्रवेश करताना अडचण निर्माण होते.बस स्थानका बाहेर पार्किंग ची सोय नसल्याने प्रवाशांना सोडायला आलेल्या चार चाकी वाहनाची गर्दी येथे दिसून येते, साहजिक बस स्थानकात वाहतूक कोंडी निर्माण होते.बस स्थानकातील वेड्या वाकड्या जागेमुळे मुक्कामाला बाहेरुन आलेल्या बस अस्ताव्यस्त लावलेल्या असतात.शेड क्रमांक २५ ते २८ नवीन सुरु करण्यात आले असून रात्री तिथे मुक्कामी आलेल्या बसेस अस्ताव्यस्त लावल्या असल्याने शेड कडे प्रवाशी जात नाहीत,व बसेस सुध्दा जात नाही.वाहतूकीची कोंडी मुळे बाहेर रस्त्यावर बसेस उभ्या करून काही बस कंडक्टर बस स्थानकात येऊन प्रवाशांना बस कडे घेऊन जातात, प्रवाशांना जड सामान बाहेर बसकडे घेऊन जाताना खूपच त्रास सहन करावा लागतो.खाजगी वाहनाचे दलाल स्वारगेट बस फिरुन प्रवाशांना खाजगी वाहनाने पुढील प्रवासासाठी घेऊन जातात.पावसाळा नसतानाही तेथील तुटलेल्या गटाराचे पाणी बस स्थानकात ठिक ठिकाणी जमा होते, बाहेर गावाहून बस या स्थानकात आणणे व तेथून बाहेर पुढील प्रवासासाठी जाणे म्हणजे चालकांच्या दृष्टीने तारेवरची कसरत असते.प्रवाशांना बसण्यासाठी बस स्थानकातील बसण्याच्या जागेवर तेथे भिकारी, गर्दुल्ले,दारुडे, बेवारस लोक बसलेले असतात.प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही.महामंडळाचे सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना ही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात.रात्रीच्या वेळी बस स्थानकात आली की शेड समोर उभी न करता समोरच उभी करतात.बस कोणती आहे हे पाहण्यासाठी प्रवाशी बस समोर गर्दी करतात व पुन्हा विखुरले जातात.प्रत्येक बस स्थानकात आल्यावर असे घडते.यामध्ये लहान मुले, महिला, वृध्दांना खूप त्रास होतो.महामंडळाने या स्थानकातील खाजगी वाहने, खाजगी दलाल, रिक्षा वाले, भिकारी, गर्दुल्ले दारुडे यावर नियंत्रण ठेवावे, वेड्या वाकड्या जागेत विभागलेल्या या बस स्थानकाचा राज्य परिवहन महामंडळाने कायापालट करावा व प्रवाशांची या त्रासातून मुक्तता करावी.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...