Skip to main content

बोरीवली सुकर वाडी एसटी स्थानकाच्या आवारातील समस्या कडे दुर्लक्ष करु नये... पत्रकार भारत कवितके.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

बोरीवली सुकर वाडी एसटी स्थानकाच्या आवारात चक्क मुले किक्रेट खेळतात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे,या एसटी स्थानकात दिवस रात्र प्रवाशांची जा ये चालू असते, स्थानकांच्या आवारात मुले खेळताना त्यांचा चेंडू महिलाना वृध्दांना,व इतर प्रवाशांना लागतो, वेदना ने प्रवाशी कण्हतो, वेळ प्रसंगी चक्कर येऊन खाली पडतो,या वेळी खेळाणारी मुले एकत्र येऊन प्रवाशांनाच दमदाटी करतात, मध्ये कशाला आला, म्हणून अंगावर धावून जातात, तसेच तेथील शौचालय च्या बाजूला बाहेरील रिक्षा,चार चाकी व इतर खाजगी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग करुन वाहन चालक शौचालय कडे जातात, त्यांच्या ही वाहनांची काच चेंडू मुळे फुटते,मुले व चालक यांच्या मध्ये जोरदार बाचाबाची होऊन वेळ प्रसंगी मारामारी ही होत असते, बाजूला असलेल्या शेड मध्ये प्रवाशांपेक्षा गर्दुल्ले, दारुडे, भिकारी, बेवारस लोकांनी कायम स्वरुपी आश्रय घेतलेला आढळून येतो.हे लोक प्रवाशांना तिथे धारा देत नाहीत,तिथे थांबू देत नाही, येथील स्थानिक राज्य परिवहन महामंडळ या कडे दुर्लक्ष करीत असताना दिसते, या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना ही तेथील या सर्व समस्या कडे दुर्लक्ष केले जाते.खेळणारी मुले,शेड मधील प्रवाशां व्यतिरिक्त इतर लोक व त्यापासून प्रवाशांना होणारा त्रास तेथील सुरक्षा रक्षकांनी लक्ष देऊन कमी करावा, अन्यथा येथे प्रवाशांच्या रागाचा कधी उद्रेक होईल. हे सांगता येणार नाही.याची सर्व जबाबदारी तेथील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडे व तेथील कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांचे वर राहील.असे मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...