Skip to main content

मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्तयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विश्वस्त  एस. एम. देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गणेश मोकाशी उपस्थित होते. यावेळी देशमुख आणि नाईक म्हणाले की परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे. पत्रकारांच्या समस्यांसह आपल्या विभागात संघटनेचं काम वाढविणयाबरोबरच विभागातील जिल्हे, तालुका पत्रकार संघांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचे काम ही व्यवस्था करते. परिषदेच्या उपक्रमांची आपल्या विभागात अंमलबजावणी करण्याचे काम विभागीय सचिव पार पाडणार आहेत. विशेष म्हणजे विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे म्हणून कार्यरत असतात असे नाईक म्हणाले. परिषदेचे नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे नाशिक विभाग अमोल खरे (मनमाड), मुंबई विभाग दीपक कैतके (मुंबई फेरनियुक्ती) पुणे विभाग पी. पी. कुळकर्णी (सोलापूर), संभाजीनगर विभाग रवी उबाळे (बीड), नागपूर विभाग प्रदीप घुमडवार (नागपूर), 
अमरावती विभाग शिखरचंद हुकूमचंद बागरेचा (वाशिम), कोकण विभाग मनोज खांबे (महाड), लातूर विभाग सचिन शिवशेट्टे (उदगीर फेरनियुक्ती), कोल्हापूर विभाग चंद्रकांत क्षीरसागर (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली. एस. एम. देशमुख, किरण नाईक यांनी सर्व नवनियुक्त विभागीय सचिवांचे अभिनंदन केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...