Skip to main content

*नववर्ष साजरे करताना*


   हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्याला सुरू होते त्यामुळे डिसेंबर नंतर येणारा जानेवारी हा महिना म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला दिवस आता त्याचा आनंद साजरा करायचा की नाही याविषयी आपल्याकडे बऱ्याच चर्चा होत असतात त्या फक्त नवीन वर्षाबद्दलच मर्यादित नसून अनेक सणावारांपासून तर अगदी वाढदिवस साजरे करायचे की नाही याबद्दल देखील कायम होत असतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की जर जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, वाढदिवस साजरा करणे ही आपली पद्धत नाही,अनेक असे सण उत्सव आहेत जी साजरे करणे आपल्या हिंदू धर्माला मान्य नाही, मग यांची सुरुवात झाली तरी कुठून, अगदी लहानपणापासून मराठी शाळेत शिक्षण घेत असताना देखील दरवर्षी Happy New year हे शब्द आमच्या कानावर टाकले कुणी,, 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी फिक्स असते,, नवीन वर्ष म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी अनेक जाहिराती लावल्या जातात डिस्काउंटच्या,, बऱ्याच वस्तूवर सूट देखील दिली जाते नवीन वर्षाच्या निमित्ताने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा न देणारे देखील या ऑफर्सची आतुरतेने वाट बघत असतात अगदी छोट्या छोट्या गल्लीपासून तर दिल्लीच्या मोठ्या मोठ्या फाइव स्टार हॉटेल पूर्णपणे बुक झालेले असतात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी,,अनेक शाळा कॉलेज यांच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सहली आयोजित केल्या जातात घरातील लहान मुलांपासून तर अगदी प्रौढ व्यक्ती पर्यंत सगळ्यांचे प्लॅनिंग ठरलेले असतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी. पूर्वी तर फोन आणि सोशल मीडिया इतका जास्त नव्हता त्यामुळे फक्त ग्रीटिंग कार्ड्स किंवा हाताने बनवलेले सुंदर डिझाईनचे कार्ड वगैरे आम्हाला माहिती होते मात्र आता या लॅपटॉप आणि फोन च्या माध्यमाने नवीन वर्षासाठी विविध प्रकारचे मेसेजेस सहजतेने उपलब्ध असतात.फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील नवीन वर्ष साजरे करताना टाकले जाणारे मेसेजेस, नवीन वर्षाच्या प्लॅनिंग्स,सर्व सहजपणे शेअर होत असते अगदी नवीन वर्षासाठी केलेली शॉपिंग पासून तर सेलिब्रेशन पर्यंत कोणालाच कोणताच प्रश्न पडत नाही प्रश्न पडतो तो फक्त की जानेवारी महिन्याचा पहिला दिवस हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा करायचा की नाही. बऱ्याच लोकांना नैसर्गिकदृष्ट्याने पाहताना डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हणजे वृक्षांची झालेली पानगळ,, तापमानात प्रचंड प्रमाणात झालेली घट म्हणजे कडाक्याची थंडी,, अशा निरस झालेल्या वातावरणामध्ये नवीन वर्ष कसा काय येऊ शकतो..?हा देखील प्रश्न पडतो. अशा एक न अनेक प्रश्नांमध्ये परत एक प्रश्न पडतो की,, नवीन वर्ष साजरा करायचा की नाही करायचा.? तर चला आज विचार करूया थोडंसं बिनधास्त जगण्याबद्दल आपण ज्या वेळेस जगात आलो त्यावेळेस कोणतीच तारीख वर्ष आणि दिवस आपल्याला माहीत नव्हते आणि ज्या वेळेस ह्या जगातून आपण निरोप घेऊ त्या दिवशी देखील कोणती तारीख महिना आणि वर्ष असणार आहे याची थोडी देखील कल्पना आपल्याला नसते मग ह्या सर्वांमध्ये जर आनंद साजरा करण्यासाठी एखादा छोटासा क्षण जर निमित्त ठरत असेल आणि त्यामुळे जीवनात निखळ आनंद निर्माण होत असेल तर तो साजरा करताना इतके प्रश्न का,,? अनेक ठिकाणी निखळ आनंद आणि दिखावा यामध्ये फरक योग्य प्रकारे न समजल्यामुळे चुकीच्या पद्धतीने देखील हे क्षण साजरे करतात आणि त्यामुळे अनेक लोकांच्या भावना देखील दुखावल्या जातात त्यामुळे अनेक ठिकाणी वाद विवाद देखील होतात योग्य प्रकारे आनंद साजरा न केल्यामुळे नवीन वर्ष आहे म्हणून खूप महागड्या हॉटेल्स बुक करणे,, इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला परवडणार नाही इतके खर्च करणे,, म्हणजेच नवीन वर्ष साजरे करणे नव्हे. खऱ्या अर्थाने पाहायचे म्हटले तर आनंदाचा कोणताही क्षण असो तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळेपणाने साजरा करता यायला हवा. इंग्रजी नववर्ष साजरे करणे चुकीचे नाही मात्र आपण आपली संस्कृती विसरून जर यातून आनंद मिळवण्याचा किंवा नववर्ष साजरे करण्याचा निर्णय घेत असाल तर ते नक्कीच चुकीचे ठरू शकते. कारण संपूर्ण जगातील आपली हिंदू संस्कृती ही एकमेव अशी संस्कृती आहे, जिने कधीच कोणत्याही संस्कृतीचे अपमान केलेले नाही,, आपल्या हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील नववर्षाचे स्वागत म्हणजे नवीन पालवी, नवीन उत्साह आणि जीवनात येणाऱ्या वैशाख वनव्याला सामोरे जाण्याचे धाडस. अगदी त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यातून जानेवारी महिन्यात प्रवेश करताना देखील कोणताही दिखावा न करता निखळ आनंदाचा शोध घेणे जमले तर आपण हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे केल्याचे सार्थक होईल..

                            पूनम सुलाने सिंगल,महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...