कन्नड : महाराष्ट्राभरात आपली कवी म्हणून छाप पाडणारे
वेगवेगळ्या दैनिकातून,दिवाळी अंकातून, साप्ताहिकातून, सोशल मेडीयातून नेहमी साहित्यात चर्चेत असलेला कवी
शेती माती , सामाजिक जीवनाची जडणघडण ,लिहिणारा आणि जगणारा कवी
गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत आपल्या नावाची थाप पाडणारा
नामवंत कवी श्री.ज्ञानेश्वर गायके
जनसामान्यांनी मान्य केलेली लेखणी आता साहित्य मंडळानेही मान्य केली. खऱ्या अर्थाने राजकवी होण्याचा शिक्का मोहर्तब झाला. त्यांच्या लेखणीला "पेरणी" या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवलेखक अनुदान देऊन 'पेरणी' काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय दिला.
"अनघा प्रकाशन" ठाणे येथून ते प्रिंट होऊन वाचकांना वाचायला मिळेल..आपल्या माणसाच्या सन्मानाचे कौतुक करतांना कवी -प्रवीण दाभाडे सर व समस्त साईबाबा कॉलनी मित्र परिवारांनी पुढील वाटचालीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
----------------
Comments
Post a Comment