हा हा मी मी बोललचं पाहिजे
आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही
हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे
माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक
ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार
किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...
मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते?
देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून
काय आणि कसे सांगू ग आतून किती मी तुटते
किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते
माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला?
कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...
धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म
पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना..
मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी
तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात..
त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते
समजते मला तुमची आतुरता,तळमळ ..
पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?....
त्याची माय,बहिण,भार्या,लेक का दिसत नाही त्याला माझ्यात
आपले संस्कारच कमी पडतात का ? असे चित्र पाहिल्यावर वाटते
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...
मी का या समाजातील काही दृष्ट लोकांच्यासाठी एक खेळणं आहे का ?
माझ्या मनाचा,जीवनाचा विचार ही यांच्या मनाला शिवत नाही
निरागस,निष्पाप लेकीसह,सरणावर जाणारी माय ही येथे सुरक्षित नाही
वासना इतकी कशी बळावली याचा विचार कोणी कधी केला का?
प्रश्न विचारा प्रत्येकाने स्वतः ला याला मीच तर जबाबदार नाही ना?
याचे उत्तर हो असेच येईल..कारण तेच सत्य आहे
याला आपणच जबाबदार आहोत,कारण अशी जनावरे सावज शोधून शिकार करतात तेव्हा त्यांना आपणच पाठीशी घालतो....
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...
न्यायदेवतेचे डोळे जरी आता उघडे केले तरी ती अंधाचेच सोंग घेते...
न्याय व्यवस्थेने त्यांची पुराव्या अभावी किंवा कागदपत्रे बदलून
अलगद अशा जनावरांची सुटका केली जाते ती ही पैशाच्या जोरावर
तेव्हा कोठे जातात आपल्यातील छत्रपती शिवाजीचे विचार..
कोठे जाते माणुसकी? लाज,शरम सारी गुंडाळून जणू ठेवून देतात
अशी जनावरे बहुतेक जवळची म्हणजे घरातीलच असतात...
त्याचाच ती गौर फायदा घेतात..अन् माणुसकीला काळीमा फासतात ..
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...
पूर्वीची न्याय व्यवस्था आठवा कशी होती अव्वल,प्रबळ,विश्वासू
चुकीला तेव्हा माफी ही कधीच नव्हती,पळवाटा तर बिल्कुल नव्हत्या
तेव्हाही अशी काही कृत्य थोड्याप्रमाणात घडत होतीच,पण तेव्हा वचक होती,शिस्त होती..
आता कोठे गेला तो न्याय,निवाडा,ती वचक?
दुराचार असाच जर फोफाळला तर जगणेच मुश्किल होवून जाईल..
सगळीकडे अराजकता माजेल,हाहाकार होईल
विश्वास तर कधीच गमावून बसलेले आपण,माणूस म्हणून तर कायमचे हरू
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...
घरोघरी संस्कारांची पेरणी ही बालपणीच होणे गरजेचे
प्रत्येकाच्या घरात शांत, संयमी,भावनिक,विश्वासू संस्कार व्हायला हवे
पुरातन,बोधपर कथांचे वाचन,स्मरण होणे,गरजेचे आहे
परकीय परंपरांना तीलांजली देवून..आपल्या संस्कृतीची रुजवण व्हावी
हरेकाच्या मुखावर मायबापाच्या कर्तृत्वाचा,नावाचा जागर व्हावा
आई बाप,शिक्षक,निसर्ग हेच आपले गुरू मानले पाहिजे..
भगवतगीता,गाथा,संविधान सर्वत्र बोलबाला व्हावा
चुकीला माफी नसावी,न्याय निवाडा ताबडतोब व्हावा
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...
काही कळ्या खुलण्यापूर्वीच कुस्करल्या जातात,गर्भातच मारल्या जातात
तर काही अशा जनावरांची शिकार होतात
तर काही भर रस्त्यावर,दिवसा ढवळ्या शिकार होतात
यांच्या कृत्याची शिक्षा ताबडतोब देणारा पुन्हा माझा शिवराय जन्मावा..
ज्यांच्या हातात सर्व माणुसकी सत्ता असेल,ज्याला कोमल हृदय असेल
सर्वात महत्त्वाचे प्रथम त्याने संविधान जाणलेले असेल..
संविधान डोक्यावर घेवून न नाचता,त्याच्या हरेक पानांचा,शब्दांचा अर्थ समजून घ्यावा
भाव भक्तीचा मेळा,तुकोबाची वारी,घराघरांतून निघावी
संस्कार हे कृतीतून, बोलीतून,वागणुकीतून दिसावे
तरच या भारतातील हरेक महिला,पुरुष सुरक्षित राहील
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
Comments
Post a Comment