Skip to main content

मी बोललचं पाहिजे


हा हा मी मी बोललचं पाहिजे
आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही
हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे
माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक
ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार
किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते?
देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून
काय आणि कसे सांगू ग आतून किती  मी तुटते
किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते
माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला?
कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म
पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना..
मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी
तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात..
त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते
समजते मला तुमची आतुरता,तळमळ ..
पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?....
त्याची माय,बहिण,भार्या,लेक का दिसत नाही त्याला माझ्यात
आपले संस्कारच कमी पडतात का ? असे चित्र पाहिल्यावर वाटते
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

मी का या समाजातील काही दृष्ट लोकांच्यासाठी एक खेळणं आहे का ?
माझ्या मनाचा,जीवनाचा विचार ही यांच्या मनाला शिवत नाही
निरागस,निष्पाप लेकीसह,सरणावर जाणारी माय ही येथे सुरक्षित नाही
वासना इतकी कशी बळावली याचा विचार कोणी कधी केला का?
प्रश्न विचारा प्रत्येकाने स्वतः ला याला मीच तर जबाबदार नाही ना?
याचे उत्तर हो असेच येईल..कारण तेच सत्य आहे
याला आपणच जबाबदार आहोत,कारण अशी जनावरे सावज शोधून शिकार करतात तेव्हा त्यांना आपणच पाठीशी घालतो....
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे..
आज नाही तर कधीच नाही...

न्यायदेवतेचे डोळे जरी आता उघडे केले तरी ती अंधाचेच सोंग घेते...
न्याय व्यवस्थेने त्यांची पुराव्या अभावी किंवा कागदपत्रे बदलून
अलगद अशा जनावरांची सुटका केली जाते ती ही पैशाच्या जोरावर
तेव्हा कोठे जातात आपल्यातील छत्रपती शिवाजीचे विचार..
कोठे जाते माणुसकी? लाज,शरम सारी गुंडाळून जणू ठेवून देतात
अशी जनावरे बहुतेक जवळची म्हणजे घरातीलच असतात...
त्याचाच ती गौर फायदा घेतात..अन् माणुसकीला काळीमा फासतात ..
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

पूर्वीची न्याय व्यवस्था आठवा कशी होती अव्वल,प्रबळ,विश्वासू
चुकीला तेव्हा माफी ही कधीच नव्हती,पळवाटा तर बिल्कुल नव्हत्या
तेव्हाही अशी काही कृत्य थोड्याप्रमाणात घडत होतीच,पण तेव्हा वचक होती,शिस्त होती..
आता कोठे गेला तो न्याय,निवाडा,ती वचक?
दुराचार असाच जर फोफाळला तर जगणेच मुश्किल होवून जाईल..
सगळीकडे अराजकता माजेल,हाहाकार होईल
विश्वास तर कधीच गमावून बसलेले आपण,माणूस म्हणून तर कायमचे हरू
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

घरोघरी संस्कारांची पेरणी ही बालपणीच होणे गरजेचे
प्रत्येकाच्या घरात शांत, संयमी,भावनिक,विश्वासू संस्कार व्हायला हवे 
पुरातन,बोधपर कथांचे वाचन,स्मरण होणे,गरजेचे आहे
परकीय परंपरांना तीलांजली देवून..आपल्या संस्कृतीची रुजवण व्हावी
हरेकाच्या मुखावर मायबापाच्या कर्तृत्वाचा,नावाचा जागर व्हावा
आई बाप,शिक्षक,निसर्ग हेच आपले गुरू मानले पाहिजे..
भगवतगीता,गाथा,संविधान सर्वत्र बोलबाला व्हावा
चुकीला माफी नसावी,न्याय निवाडा ताबडतोब व्हावा
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

काही कळ्या खुलण्यापूर्वीच कुस्करल्या जातात,गर्भातच मारल्या जातात
तर काही अशा जनावरांची शिकार होतात
तर काही भर रस्त्यावर,दिवसा ढवळ्या शिकार होतात
यांच्या कृत्याची शिक्षा ताबडतोब देणारा पुन्हा माझा शिवराय जन्मावा..
ज्यांच्या हातात सर्व माणुसकी सत्ता असेल,ज्याला कोमल हृदय असेल
सर्वात महत्त्वाचे प्रथम त्याने संविधान जाणलेले असेल..
संविधान डोक्यावर घेवून न नाचता,त्याच्या हरेक पानांचा,शब्दांचा अर्थ समजून घ्यावा
भाव भक्तीचा मेळा,तुकोबाची वारी,घराघरांतून निघावी
संस्कार हे कृतीतून, बोलीतून,वागणुकीतून दिसावे
तरच या भारतातील हरेक महिला,पुरुष सुरक्षित राहील
म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे,
आज नाही तर कधीच नाही...

सौ.प्रतिमा अरुण काळे 
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...